शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शहरात ६ कामगारांचा यापूर्वीही मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू; मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशन’ची यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:43 IST

मोठ्या दुर्घटनेनंतरही मनपा निद्रिस्तच 

ठळक मुद्दे‘रेस्क्यू ऑपरेशन’साठी अग्निशमनकडे यंत्रणा नाहीजीव धोक्यात घालून जवान मॅनहोलमध्ये कसे उतरणार?

औरंगाबाद : ड्रेनेजच्या चेंबरमध्ये कामगार गुदमरून मरण पावल्याच्या घटना शहरात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. या घटनांमधून महापालिकेने कोणताही बोध घेतला नाही. एन-१२ भागात चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चेंबर उघडल्यामुळे विषारी वायूने दोन जणांचा बळी घेतला होता. त्यापूर्वी मुकुंदवाडी येथे गणपती विसर्जनाच्या विहिरीतील गाळ काढताना विषारी वायूमुळेच चार कामगारांचा मृत्यू झाला होता. अशा घटनांमध्ये रेस्क्यू आॅपरेशनसाठी लागणारी यंत्रणाच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सोमवारी चिकलठाणा भागातील पॉवरलुम येथे ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या एका शेतमजुराला मोठ्या मेनहोलमध्ये शॉक लागला. त्याला वाचविण्यासाठी आणखी सहा जण खाली उतरले. ड्रेनेजच्या वायूमुळे गुदमरून दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. चार जण रुग्णालयात दाखल आहेत. एकाचा मृतदेह सापडला नाही. या गंभीर घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. मेनहोलमध्ये उतरून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाकडे कोणतेच साहित्य नाही. 

मेनहोलमध्ये उतरण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा ड्रेस आणि आॅक्सिजन मास्क आवश्यक असतो, या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्याने जवान आत उतरू शकले नाहीत. शेवटी मेनहोल जेसीबीने फोडून आतील जखमी, मयत व्यक्तींना बाहेर काढावे लागले. अशा अशास्त्रोक्त पद्धतीचा महापालिका कुठपर्यंत वापर करणार? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. 

एन-१२ परिसरातील यादवनगर येथे खाजगी कंत्राटदाराच्या दोन मजुरांनी चार वर्षांपूर्वी ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी अचानक ढापा उघडला. या ढाप्याच्या आत अत्यंत विषारी वायू असतो याची जाणीवही कामगारांना नव्हती. छोट्याशा ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. मुकुंदवाडी येथे गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यात येत होता. विहिरीत उतरून कामगार गाळ काढत होते. जुन्या गाळात मोठ्या प्रमाणात विषारी वायू होता. या विषारी वायूमुळे गुदमरून विहिरीत काम करणारे चार कामगार मरण पावले होते. या कामगारांचे मृतदेह काढतानाही अग्निशमन दलाला बरीच कसरत करावी लागली होती. शहरात अशा घटना आता वारंवार घडत असताना मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अवजारेही नाहीत. 

शहरातील तिसरी घटनामुकुंदवाडी गावात गणेश विर्सजनपूर्वी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. मृत मजूर कंत्राटदाराकडे कामाला होते. हडको एन-१२ भागातील यादवनगर येथे चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चोकअप काढताना दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. हे कामही खाजगी कंत्राटदाराचे होते.चिकलठाण्यातील पॉवरलुम भागात सोमवारी दुपारी तिसरी घटना घडली. यामध्ये दोन जण मरण पावले. चार जण रुग्णालयात आहेत. एक बेपत्ता आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूAccidentअपघात