शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

शहरात ६ कामगारांचा यापूर्वीही मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू; मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशन’ची यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:43 IST

मोठ्या दुर्घटनेनंतरही मनपा निद्रिस्तच 

ठळक मुद्दे‘रेस्क्यू ऑपरेशन’साठी अग्निशमनकडे यंत्रणा नाहीजीव धोक्यात घालून जवान मॅनहोलमध्ये कसे उतरणार?

औरंगाबाद : ड्रेनेजच्या चेंबरमध्ये कामगार गुदमरून मरण पावल्याच्या घटना शहरात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. या घटनांमधून महापालिकेने कोणताही बोध घेतला नाही. एन-१२ भागात चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चेंबर उघडल्यामुळे विषारी वायूने दोन जणांचा बळी घेतला होता. त्यापूर्वी मुकुंदवाडी येथे गणपती विसर्जनाच्या विहिरीतील गाळ काढताना विषारी वायूमुळेच चार कामगारांचा मृत्यू झाला होता. अशा घटनांमध्ये रेस्क्यू आॅपरेशनसाठी लागणारी यंत्रणाच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सोमवारी चिकलठाणा भागातील पॉवरलुम येथे ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या एका शेतमजुराला मोठ्या मेनहोलमध्ये शॉक लागला. त्याला वाचविण्यासाठी आणखी सहा जण खाली उतरले. ड्रेनेजच्या वायूमुळे गुदमरून दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. चार जण रुग्णालयात दाखल आहेत. एकाचा मृतदेह सापडला नाही. या गंभीर घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. मेनहोलमध्ये उतरून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाकडे कोणतेच साहित्य नाही. 

मेनहोलमध्ये उतरण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा ड्रेस आणि आॅक्सिजन मास्क आवश्यक असतो, या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्याने जवान आत उतरू शकले नाहीत. शेवटी मेनहोल जेसीबीने फोडून आतील जखमी, मयत व्यक्तींना बाहेर काढावे लागले. अशा अशास्त्रोक्त पद्धतीचा महापालिका कुठपर्यंत वापर करणार? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. 

एन-१२ परिसरातील यादवनगर येथे खाजगी कंत्राटदाराच्या दोन मजुरांनी चार वर्षांपूर्वी ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी अचानक ढापा उघडला. या ढाप्याच्या आत अत्यंत विषारी वायू असतो याची जाणीवही कामगारांना नव्हती. छोट्याशा ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. मुकुंदवाडी येथे गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यात येत होता. विहिरीत उतरून कामगार गाळ काढत होते. जुन्या गाळात मोठ्या प्रमाणात विषारी वायू होता. या विषारी वायूमुळे गुदमरून विहिरीत काम करणारे चार कामगार मरण पावले होते. या कामगारांचे मृतदेह काढतानाही अग्निशमन दलाला बरीच कसरत करावी लागली होती. शहरात अशा घटना आता वारंवार घडत असताना मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अवजारेही नाहीत. 

शहरातील तिसरी घटनामुकुंदवाडी गावात गणेश विर्सजनपूर्वी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. मृत मजूर कंत्राटदाराकडे कामाला होते. हडको एन-१२ भागातील यादवनगर येथे चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चोकअप काढताना दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. हे कामही खाजगी कंत्राटदाराचे होते.चिकलठाण्यातील पॉवरलुम भागात सोमवारी दुपारी तिसरी घटना घडली. यामध्ये दोन जण मरण पावले. चार जण रुग्णालयात आहेत. एक बेपत्ता आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूAccidentअपघात