शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ६ कामगारांचा यापूर्वीही मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू; मनपाकडे रेस्क्यू ऑपरेशन’ची यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:43 IST

मोठ्या दुर्घटनेनंतरही मनपा निद्रिस्तच 

ठळक मुद्दे‘रेस्क्यू ऑपरेशन’साठी अग्निशमनकडे यंत्रणा नाहीजीव धोक्यात घालून जवान मॅनहोलमध्ये कसे उतरणार?

औरंगाबाद : ड्रेनेजच्या चेंबरमध्ये कामगार गुदमरून मरण पावल्याच्या घटना शहरात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. या घटनांमधून महापालिकेने कोणताही बोध घेतला नाही. एन-१२ भागात चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चेंबर उघडल्यामुळे विषारी वायूने दोन जणांचा बळी घेतला होता. त्यापूर्वी मुकुंदवाडी येथे गणपती विसर्जनाच्या विहिरीतील गाळ काढताना विषारी वायूमुळेच चार कामगारांचा मृत्यू झाला होता. अशा घटनांमध्ये रेस्क्यू आॅपरेशनसाठी लागणारी यंत्रणाच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सोमवारी चिकलठाणा भागातील पॉवरलुम येथे ड्रेनेजचे पाणी चोरणाऱ्या एका शेतमजुराला मोठ्या मेनहोलमध्ये शॉक लागला. त्याला वाचविण्यासाठी आणखी सहा जण खाली उतरले. ड्रेनेजच्या वायूमुळे गुदमरून दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. चार जण रुग्णालयात दाखल आहेत. एकाचा मृतदेह सापडला नाही. या गंभीर घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन विभागाला कळविण्यात आली. मेनहोलमध्ये उतरून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाकडे कोणतेच साहित्य नाही. 

मेनहोलमध्ये उतरण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा ड्रेस आणि आॅक्सिजन मास्क आवश्यक असतो, या दोन्ही गोष्टींचा अभाव असल्याने जवान आत उतरू शकले नाहीत. शेवटी मेनहोल जेसीबीने फोडून आतील जखमी, मयत व्यक्तींना बाहेर काढावे लागले. अशा अशास्त्रोक्त पद्धतीचा महापालिका कुठपर्यंत वापर करणार? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. 

एन-१२ परिसरातील यादवनगर येथे खाजगी कंत्राटदाराच्या दोन मजुरांनी चार वर्षांपूर्वी ड्रेनेजचे चोकअप काढण्यासाठी अचानक ढापा उघडला. या ढाप्याच्या आत अत्यंत विषारी वायू असतो याची जाणीवही कामगारांना नव्हती. छोट्याशा ड्रेनेज चेंबरमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. मुकुंदवाडी येथे गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यात येत होता. विहिरीत उतरून कामगार गाळ काढत होते. जुन्या गाळात मोठ्या प्रमाणात विषारी वायू होता. या विषारी वायूमुळे गुदमरून विहिरीत काम करणारे चार कामगार मरण पावले होते. या कामगारांचे मृतदेह काढतानाही अग्निशमन दलाला बरीच कसरत करावी लागली होती. शहरात अशा घटना आता वारंवार घडत असताना मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अवजारेही नाहीत. 

शहरातील तिसरी घटनामुकुंदवाडी गावात गणेश विर्सजनपूर्वी सार्वजनिक विहिरीतील गाळ काढताना चार मजुरांचा मृत्यू झाला होता. मृत मजूर कंत्राटदाराकडे कामाला होते. हडको एन-१२ भागातील यादवनगर येथे चार वर्षांपूर्वी ड्रेनेज चोकअप काढताना दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. हे कामही खाजगी कंत्राटदाराचे होते.चिकलठाण्यातील पॉवरलुम भागात सोमवारी दुपारी तिसरी घटना घडली. यामध्ये दोन जण मरण पावले. चार जण रुग्णालयात आहेत. एक बेपत्ता आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDeathमृत्यूAccidentअपघात