शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव, राज्यातील उद्योग-व्यवसायाला शॉक देणारा

By बापू सोळुंके | Updated: February 13, 2023 20:38 IST

वीज ग्राहक समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष प्रताप होगाडे : २८ फेब्रुवारी रोजी राज्यभर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी

औरंगाबाद : देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत आधीच महाराष्ट्रातील विजेचे दर सर्वाधिक आहेत. असे असताना महावितरणने त्यांचा भ्रष्टाचार, वीज चोऱ्या आणि अकार्यक्षमता लपविण्यासाठी वीज ग्राहकांच्या माथी ३७ टक्के वीज दरवाढ लादण्याचा प्रस्ताव सादर केला आहे, असा आरोप वीज ग्राहक व औद्योगिक संघटनेच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या दरवाढीमुळे उद्योग, व्यवसाय बंद करावा लागेल किंवा दुसऱ्या राज्यात हलवावा, लागू शकतो, तसेच सामान्य वीज ग्राहक, शेतकरी यांच्यासाठी ही दरवाढ कंबरडे मोडणारी आहे. या दरवाढविरोधात २८ फेब्रुवारी रोजी राज्यभर महावितरणच्या प्रस्तावाची होळी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

होगाडे म्हणाले की, महावितरण कंपनीने ६७.६४४ कोटी रुपये तुटीची भरपाई करण्यासाठी सरासरी ३७ टक्के म्हणजेच प्रतियुनिट २ रुपये ५५ पैसे दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. राज्य वीज नियामक आयोगावरील अध्यक्ष आणि सदस्य हे महावितरण कंपनीशी संबंधित असतात. यामुळे आयोगाकडून महावितरणच्या बाजूनेच एकतर्फी निकाल ते देत असतात. आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत ई-फायलिंग पद्धतीने ऑनलाइन हरकती मागविल्या आहेत. यामुळे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींची भेट घेऊन ही दरवाढ रद्द करावी, यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी वीज नियामक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन हकरती दाखल कराव्यात, असे आमचे आवाहन आहे. आधीच महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील अन्य राज्यांप्रमाणे वीजदराची आकारणी करावी, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य म्हणाले की, अत्यंत कमी मार्जिनवर लघु उद्योग चालतो. आता नव्या दरवाढीमुळे आम्हाला उद्योग बंद करावे लागतील. याचे राज्याच्या विकासावर गंभीर परिणाम होतील. सौर ऊर्जेचा लोडही २० टक्क्यांवर देऊ देत नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद