शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 3, 2024 19:55 IST

मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर

छत्रपती संभाजीनगर : सरकारने एखादी योजना आणली, तर तिचा फायदा घेणाऱ्यांपेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. बँकेतून कर्ज घेतले की, सरकार आज ना उद्या माफ करील, या गैरसमजुतीपोटी अनेक जण कर्जाची परतफेड करतच नाहीत. याचा अंतिम फटका त्या योजनेपासून वंचित राहिलेल्या व प्रामाणिक लोकांना बसतो. याचे ज्वलंत उदाहरण केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ आहे. या योजनेत ३५ हजार व्यावसायिकांना दिलेले २४९ कोटींचे कर्ज त्यांनी फेडलेलेच नाही.

६ एप्रिल २०१५ रोजी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ची सुरुवात झाली. कॉर्पाेरेट किंवा शेतीशी संबंधित नसलेल्या लहान आणि सूक्ष्म व्यवसायांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याला ‘मुद्रा कर्ज’ असे म्हणतात.

शिशु ते तरुण कर्जव्यवसायवाढीसाठी ज्यांना आर्थिक साहाय्य आवश्यक आहे. त्या छोट्या व्यावसायिकांना भारत सरकार मुद्रा कर्ज देते. ही कर्जे व्यवसायाच्या टप्प्यांवर आणि आवश्यक कर्जाच्या रकमेवर आधारित तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत.

शिशुकर्ज : यात नवीन व्यवसायासाठी ५० हजारांपर्यंत कर्ज मिळते.

किशोर कर्ज : यात ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळते.

तरुण कर्ज : व्यवसायाचा विस्तार आणि वाढ करण्याच्या उद्देशाने ५ लाख ते १० लाख रुपयांदरम्यान कर्ज मिळते.

बँकांकडून १८५१ कोटींचे मुद्रा लोनचे वाटप २०१५ पासून बँकांनी मुद्रा लोन देण्यास सुरुवात केली. मागील नऊ वर्षांत बँकांनी २ लाख ७८ हजार १९० व्यावसायिकांना १८५१ कोटींच्या मुद्रा लोनचे वाटप करण्यात आले.

कितीजणांनी बुडवले कर्ज? ३५ हजार व्यावसायिकांनी २४९ कोटींचे कर्ज बुडवले आहे. कर्ज एनपीए राहण्याचे प्रमाण १३ टक्के आहे.

मागील आर्थिक वर्षात १४४३ कोटींचे कर्जवाटप३१ मार्चअखेर जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ७१५ व्यावसायिकांना १४४३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर तर मराठवाड्यात नांदेड पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक एनपीएसुरुवातीच्या काळातील २०१५ ते २०१७ या काळात ज्या व्यावसायिकांनी मुद्रा लोन घेतले. त्यातील अनेक व्यावसायिकांनी त्याची परतफेड केली नाही. यामुळे ही खाती एनपीएमध्ये गेली आहेत. जुन्या मुद्रा कर्जाची नियमितपणे परतफेड केली की, त्यांना पुढील कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना २० लाखांपर्यंत मिळतेय कर्जमुद्रा कर्ज योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आली आहे. ज्यांनी मुद्रा लोन घेऊन त्याची नियमित परतफेड करत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदारांसाठी कर्जमर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. कर्ज न फेडल्यास कर्जदाराच्या विकासाचे सर्व मार्ग बंद होतात. त्यांना पुन्हा बँका कर्ज देत नाहीत; यामुळे कर्जाची नियमित परतफेड करावी.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँकbusinessव्यवसाय