शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 3, 2024 19:55 IST

मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर

छत्रपती संभाजीनगर : सरकारने एखादी योजना आणली, तर तिचा फायदा घेणाऱ्यांपेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. बँकेतून कर्ज घेतले की, सरकार आज ना उद्या माफ करील, या गैरसमजुतीपोटी अनेक जण कर्जाची परतफेड करतच नाहीत. याचा अंतिम फटका त्या योजनेपासून वंचित राहिलेल्या व प्रामाणिक लोकांना बसतो. याचे ज्वलंत उदाहरण केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ आहे. या योजनेत ३५ हजार व्यावसायिकांना दिलेले २४९ कोटींचे कर्ज त्यांनी फेडलेलेच नाही.

६ एप्रिल २०१५ रोजी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ची सुरुवात झाली. कॉर्पाेरेट किंवा शेतीशी संबंधित नसलेल्या लहान आणि सूक्ष्म व्यवसायांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याला ‘मुद्रा कर्ज’ असे म्हणतात.

शिशु ते तरुण कर्जव्यवसायवाढीसाठी ज्यांना आर्थिक साहाय्य आवश्यक आहे. त्या छोट्या व्यावसायिकांना भारत सरकार मुद्रा कर्ज देते. ही कर्जे व्यवसायाच्या टप्प्यांवर आणि आवश्यक कर्जाच्या रकमेवर आधारित तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत.

शिशुकर्ज : यात नवीन व्यवसायासाठी ५० हजारांपर्यंत कर्ज मिळते.

किशोर कर्ज : यात ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळते.

तरुण कर्ज : व्यवसायाचा विस्तार आणि वाढ करण्याच्या उद्देशाने ५ लाख ते १० लाख रुपयांदरम्यान कर्ज मिळते.

बँकांकडून १८५१ कोटींचे मुद्रा लोनचे वाटप २०१५ पासून बँकांनी मुद्रा लोन देण्यास सुरुवात केली. मागील नऊ वर्षांत बँकांनी २ लाख ७८ हजार १९० व्यावसायिकांना १८५१ कोटींच्या मुद्रा लोनचे वाटप करण्यात आले.

कितीजणांनी बुडवले कर्ज? ३५ हजार व्यावसायिकांनी २४९ कोटींचे कर्ज बुडवले आहे. कर्ज एनपीए राहण्याचे प्रमाण १३ टक्के आहे.

मागील आर्थिक वर्षात १४४३ कोटींचे कर्जवाटप३१ मार्चअखेर जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ७१५ व्यावसायिकांना १४४३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर तर मराठवाड्यात नांदेड पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक एनपीएसुरुवातीच्या काळातील २०१५ ते २०१७ या काळात ज्या व्यावसायिकांनी मुद्रा लोन घेतले. त्यातील अनेक व्यावसायिकांनी त्याची परतफेड केली नाही. यामुळे ही खाती एनपीएमध्ये गेली आहेत. जुन्या मुद्रा कर्जाची नियमितपणे परतफेड केली की, त्यांना पुढील कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना २० लाखांपर्यंत मिळतेय कर्जमुद्रा कर्ज योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आली आहे. ज्यांनी मुद्रा लोन घेऊन त्याची नियमित परतफेड करत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदारांसाठी कर्जमर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. कर्ज न फेडल्यास कर्जदाराच्या विकासाचे सर्व मार्ग बंद होतात. त्यांना पुन्हा बँका कर्ज देत नाहीत; यामुळे कर्जाची नियमित परतफेड करावी.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँकbusinessव्यवसाय