शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वीस गावांत ३२ टँकर

By admin | Updated: April 16, 2016 23:54 IST

तुळजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, त्याच प्रमाणात टँकरच्या आकडेवारीचा आलेख देखील चढत असल्याचे चित्र आहे.

तीव्रता वाढली : तुळजापूर तालुक्यात १४७ स्त्रोतांचे अधिग्रहणतुळजापूर : तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, त्याच प्रमाणात टँकरच्या आकडेवारीचा आलेख देखील चढत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील वीस गावांमध्ये ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ६७ गावे, वाड्या-तांड्यांची तहान १४७ अधिग्रहणावर भागविली जात आहे.गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. विहिरी, बोअर, कुपनलिकांचे पाणी देखील आटले असल्याने गावा-गावात पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यातच अनेक ठिकाणी तर टँकर भरण्यासाठी देखील स्त्रोत उपलब्ध नसल्याने या गावांची तहान भागविताना प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात यंदाच्या उन्हाळ्यात टँकर व अधिग्रहणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या ३२ टँकरद्वारे दररोज ११० फेऱ्या केल्या जात असून, यामध्यमातून वीस गावातील ग्रामस्थांची तहान भागत आहे.सद्यस्थितीत तालुक्यातील मंगरूळ, सलगरा (दि), अपसिंगा, खंडाळा, खुदावाडी, कसई, अणदूर, होर्टी, ढेकरी, किलज, जळकोट, भातंब्री, बिजनवाडी, चिंचोली, मसला (खु), माळुंब्रा, खानापूर, चिवरी, वडगाव, आरळी (खु) या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, २७ तांडे-वस्ती व ४० गावांसाठी टँकरव्यतिरिक्त विहीर, बोअर अशा ११४ स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे पंचनाम्यासाठी काक्रंबा, बोरनदीवाडी, बोळेगाव, बोरगाव (तु), चिंचोली, निलेगाव, तामलवाडी, हापूर, बारूळ, किलज आणि कार्ला या गावातील १८ अधिग्रहणाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच तहसील कार्यालयाकडे ३७ प्रस्ताव मंजुरीकडेपाठविण्यात आले आहेत. टंचाई निवारणासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. टँकर तसेच अधिग्रहणासाठी दाखल झालेल्या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी विलास खिल्लारे यांनी सांगितले. (वार्ताहर) अनेक गावात भटकंती : स्त्रोत उपलब्ध नसल्याने प्रशासनाचीही होतेय कसरतसव्वादोन कोटी खर्चतालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून टँकर व अधिग्रहणावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे. सन २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत टंचाई उपाययोजनांवर २ कोटी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले असून, अजूनही पंचायत समितीकडे अधिग्रहण, टँकरसाठीचे अनेक प्रस्ताव दाखल होत आहेत. एका टँकरला एका दिवसाला साधारणत: दीड हजार रुपये याप्रमाणे महिन्याकाठी ४५ हजार म्हणजेच ३२ टँकरसाठी दरमहा १४ लाख ४० हजार रुपये खर्च होत आहेत. टँकरशिवाय अधिग्रहणावर देखील दररोज हजारो रुपये खर्च करण्यात येत आहेत.