शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

दोन दिवसांत २२ हजार शोषखड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:55 PM

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अभियानाला गती देण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २२ हजार १७ शौचालयांचे शोषखड्डे तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अभियानाला गती देण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २२ हजार १७ शौचालयांचे शोषखड्डे तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़येत्या मार्च २०१८ अखेर संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात या अभियानाला गती मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील १४० मोठ्या ग्रामपंचायतीमधून विशेष मोहीम राबवून १० व ११ आॅगस्ट या दोन दिवसांत सुमारे २२ हजार १७ शौचालयांचे शोषखड्डे करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात १० हजार शौचालय बांधकामे पूर्णत्वास आली आहेत. या अभिनव उपक्रमामुळे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानाला चालना मिळाली असल्याचे अनेक सरपंचांनी सांगितले आहे.या उपक्रमातून किनवट तालुक्यात १ हजार १२६ शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत, हिमायतनगर- ९९१, नायगाव- ४०७, बिलोली- ५९३, देगलूर- १ हजार २९१, धमार्बाद- ८९९, हदगाव- २ हजार २४६, माहूर- १ हजार ५६२, भोकर- ६३४, लोहा- १ हजार ८८६, कंधार- १ हजार ५११, मुखेड- १ हजार ६३६, नांदेड- १ हजार ५४२ आणि उमरी तालुक्यातील ६४८ शौचालयांची शोषखड्डे तयार करण्यात आली आहेत. यापूर्वी अर्धापूूर व मुदखेड तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला असून उर्वरित १४ तालुक्यांतील १४० मोठ्या ग्रामपंचायतीमधून ही मोहीम राबविण्यात आली आहे. या १४० ग्रामपंचायतींमधून आॅगस्टअखेर ५८ हजार १०६ शौचालयांचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. आतापर्यंत चालू वर्षात २४ हजार ९९७ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. सदर ग्रामपंचायतीमधून शौचालयाची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.शौचालय बांधकामानंतर त्याच्या वापरासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापना केली जाणार असून ज्या लाभार्थ्यांकडे शौचालय असूनही त्याचा वापर होत नसेल तर त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम अन्वये १२०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.