शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

२०० कोटींचा बोजा

By admin | Updated: June 2, 2014 01:35 IST

विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीने तीन वर्षांपासून गटांगळ्या खाल्ल्या.

 विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीने तीन वर्षांपासून गटांगळ्या खाल्ल्या. सप्टेंबर २०११ ते मे २०१४ या काळात वाढलेल्या जिल्हा दरसूचीप्रमाणे योजनेची किंमत सुमारे २०० कोटी रुपयांनी वाढली आहे. ही रक्कम कुणाच्या हलगर्जीपणामुळे वाढली आहे हा संशोधनाचा विषय असला तरी २०० कोटींचा बोजा नागरिकांवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०११ मध्ये काम सुरू झाले असते तर आजघडीला ७० टक्के योजनेचे काम पूर्ण झाले असते. खाबूगिरीच्या राजकारणात जलवाहिनीच्या कामाची किंमत १००० कोटी रुपयांच्या जवळपास गेली आहे. हा भुर्दंड औरंगाबादकरांच्याच माथी येणार आहे. केंद्र व राज्य शासनाने १६२ कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी देऊन तीन वर्षे झाले आहेत. त्यावर ६० कोटींचे व्याजही जमा झालेले आहे. शहरातील १३ लाख नागरिक पाण्यासाठी व्याकूळ झालेले असताना मात्र योजनेचे राजकारण झाले. भागीदारांमध्ये पैशांवरून झाला वाद कंपनीचे भागीदार एसीडब्ल्यूयूसीएलचे सीईओ अशोक अग्रवाल, एसपीएमएलचे सीईओ अमानुल्लाह, एसीडब्ल्यूयूसीएलचे भागीदार सुशील सेठी, ऋषभ सेठी, व्यंकटरामन, खा. संजय काकडे, क्रिसिलचे राकेश बंगेरा, अपीजी पाराशर, अर्जुन कदम, प्रतीक गांधी, एनएसडब्ल्यूसी, व्ही-टेक, वॅबॅगचे प्रतिनिधी मित्तल यांच्यात आर्थिक भागीदारीतून २०१३ मध्ये बिनसले. ३० एप्रिल २०१३ पर्यंत काम सुरू करा, अन्यथा कंत्राट तोडून मोकळे व्हा, अशी नोटीस आयुक्त डॉ़ कांबळे यांनी एसीडब्ल्यूयूसीएलला दिली होती. त्यांच्या नोटीसमुळे कंत्राटदारांचे खरे रूप औरंगाबादकरांसमोर आले. योजनेतील करार, भांडणे, कोर्टवारीचा प्रवास असा... २२ मार्च २०११ रोजी समांतरची निविदा मंजूर झाली. सप्टेंबर २०११ मध्ये सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग लि़ (एसपीएमएल) सोबत कन्सेशन अ‍ॅग्रीमेंट झाले.कंपनीने आॅक्टोबर २०११ मध्ये फ्रँ किंग करून पालिकेची ७ कोटी ५० लाखांची ईएमडी भरली़ मनपाने कंपनीला एप्रिल २०१२ पर्यंत प्री-पिरेटरी पिरियड दिला़ दरम्यान, एसपीएमएलने स्पेशल पर्पज व्हेईकलअंतर्गत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीची स्थापना केली. १ मे २०१२ रोजी योजनेचे काम सुरू होणे गरजेचे होते़ १ जानेवारी २०१३ रोजी मनपाने ती योजना व शहरातील पाणीपुरवठ्याचे काम एसीडब्ल्यूयूसीएलकडे (औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी) विनाकरार, तांत्रिक सक्षमता नसताना हस्तांतरित केले़ ७ जानेवारी २०१३ पासून योजनेचे काम बंद पडले. त्यानंतर जायकवाडीत कॉफर डॅमचे काम करण्यात आले. आयुक्त डॉ. कांबळे यांनी ३० एप्रिलपर्यंत काम सुरू करण्यासाठी कंपनीला नोटीस दिली. त्यानंतर विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदार बदलण्याचे आदेश दिले. कंपनी आणि मनपात कोर्टवार्‍या सुरू झाल्या.