शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांमधील ‘गणित’ चुकले

By admin | Updated: September 13, 2014 23:45 IST

सध्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशातच शिक्षण विभागाने

गरज ५५० शिक्षकांची; नियुक्त केवळ ४९ शिक्षकरवी जवळे - चंद्रपूरसध्या कॉन्व्हेंट संस्कृतीमुळे नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आली आहे. पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशातच शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांना नवसंजिवनी देत शिक्षण प्रणालीत आमुलाग्र बदल केला. एक ते ५ पर्यंतचे वर्ग पूर्व प्राथमिक केले व सहा ते आठपर्यंतचे वर्ग प्राथमिक करीत जिल्हा परिषद शाळांना जोडले. आता या शाळांमध्ये गणित व विज्ञान विषयांसाठी ५५० शिक्षकांची गरज आहे. मात्र जिल्हा परिषदेने केवळ ४९ शिक्षकांचीच नियुक्ती केली आहे. उर्वरित शिक्षकच नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील गणित व विज्ञान विषयांचा बोजवारा वाजला आहे.अलिकडे इंग्रजीला चांगले दिवस आले आहे; नव्हे तर इंग्रजीशिवाय स्पर्धेच्या युगात टिकणे अवघड झाले आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे जाळेही सर्वत्र पसरले आहे. विद्यार्थ्यांचा व पालकांचाही कल इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांकडे वाढला आहे. त्यामुळे नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषद शाळांवर अवकळा पसरली आहे. या शाळांमधील पटसंख्या मागील पाच वर्षात झपाट्याने कमी झाली आहे. एवढी की या शाळांचे अस्तित्व टिकविणे स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. अशातच शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांना नवसंजिवनी देत शिक्षण प्रणालीत यावर्षीपासून बदल घडवून आणला. पूर्वी पहिला ते चवथ्या वर्गापर्यंतचे शिक्षण प्राथमिक व पाच ते सात वर्गापर्यंतचे शिक्षण मिडकस्कूल असायचे. त्यानंतर आठ ते दहाव्या वर्गापर्यंत माध्यमिक शिक्षण असायचे. आता पहिली ते चवथीला आणखी पाचवा वर्ग जोडून त्याला पूर्व प्राथमिक करण्यात आले. तर सहावी ते आठवीचे शिक्षण प्राथमिक केले. यामुळे आतापर्यंत खासगी शाळांमध्ये असलेला आठवा वर्ग जिल्हा परिषद शाळांना जोडण्यात आला. जिल्हा परिषद शाळांमध्ये नवा आठवा वर्ग आल्याने गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षकांची गरज भासू लागली. जिल्ह्यात आठवा वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या २१० शाळा आहेत. या शाळांमध्ये सहा ते आठ वर्ग आहेत. पूर्वी जिल्हा परिषद शाळांमध्ये सातवीपर्यंत वर्ग असल्याने डीएड किंवा पदवीधर शिक्षकच विज्ञान विषय शिकवित होता. आता शासकीय नियमानुसार सहा ते आठ वर्गाला गणित व विज्ञान विषय शिकविण्यासाठी विज्ञान विषयाचाच शिक्षक हवा. जिल्हा परिषद शाळांना अशा ५५० शिक्षकांची गरज आहे. दरम्यान ही गरज पूर्ण करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ७३ शिक्षकांना नियुक्तीसाठी बोलाविले. यातील केवळ ४९ शिक्षकांचीच २८ जुलैला विज्ञान शिक्षक म्हणून नियुक्ती केली.