शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारची गती मंदावली

By admin | Updated: June 8, 2015 01:45 IST

वरुणराजाच्या अवकृपेमुळे २०१४-१५ या वर्षांत कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट जिल्ह्यावर ओढावले.

केवळ ३४० कामे पूर्ण : अधिकाऱ्यांत समन्वयाचा अभावचंद्रपूर : वरुणराजाच्या अवकृपेमुळे २०१४-१५ या वर्षांत कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट जिल्ह्यावर ओढावले. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्याची भूजल पातळी घटली. दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर मात करण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जिल्ह्यात झालेल्या कामांची स्थिती पाहता योजनेची कामे मंदावल्याचे दिसून येते. जलयुक्त शिवार अभियानार्तंगत जिल्ह्यातील १५ तालुक्यातील २१८ गावांची निवड करण्यात आली. मात्र यातील केवळ १६५ गावांमध्येच प्रत्यक्ष कामांना सुरूवात करण्यात आली आहे. या गावांत ५६० कामे प्रस्तावित असून यातील केवळ ३४० कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत दरवर्षी निरीक्षण विहिरींची पाणी पातळी मोजली जाते. उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर संभाव्य पाणीटंचाई आराखडे तयार करण्याकरिता तसेच संभाव्य टंचाई परिस्थितीचे आकलन करण्याकरिता तालुकानिहाय व पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरीतील मान्सूनोत्तर भूजल स्थिर पातळीचा आढावा घेण्यात येतो. या आकलनात डिसेंबर महिन्यात राज्यातील तब्बल १९० तालुक्यांची भूजल पातळी तीन मीटरने घटल्याचे समोर आले. तर १८४ तालुक्यात २० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीपातळी घटली. तसेच १८८ तालुुक्यात भूगर्भातील पाणीपातळीत दोन मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत दिले होते. याची दखल घेत राज्य शासनाने दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार भेट अभियान सुरू करण्याचे आखले. भूजल पातळीत झालेली घट व उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणी टंचाई यावर मात करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तसेच जुन्या जलसंरचनाचे पुर्नजिवन करणे, पाझर तलाव, लघु सिंचन तलाव दुरूस्ती व नुतणीकरण करून पाणी साठवणूक क्षमता वाढविणे, छोटे ओढे व नाल्यांची जोडणी करणे, कालव्याची स्वच्छता करणे, विहिर बोअरवेल पुनर्भरण, अस्तीत्वात असलेल्या लघु पाटबंधाऱ्याच्या कामाला गती देणे आदी कामे प्राधान्याने होणे गरजेचे असताना प्रशासनाने याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याने कामांची गती मंदावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी) जिल्हास्तरीय निधीतून कामेअभियानाच्या माध्यमातून कृषी, लघुसिंचन, जलसंपदा व जिल्हा परिषदेच्या वतीने गाव तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, सिमेंट क्रॉक्रीट बंधारे बांधकाम, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, जोड प्रकल्प राबविणे, कालवा दुरुस्ती, वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, मोठ्या व मध्यम प्रकल्पाची उपयोगीता वाढविणे आदी कामे करण्यात येत आहेत. ही कामे जिल्हास्तरावर उपलब्ध होणाऱ्या निधीतून होणार असून या कामांचे मूल्यमापनही शासनाकडून करण्यात येणार आहे. मात्र अधिकाऱ्यांचेच कामांकडे दुर्लक्ष होताना कामाच्या स्थितीवरून दिसून येते.सिंचनालाही लागणार होता हातभारजिल्ह्यातील शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडवाहू स्वरूपाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती व्यवसाय करावा लागतो. शेतकऱ्यांना अस्मानी संकटातून सावरण्यासाठी व निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान महत्त्वाची भूमिका पार पाडणार होते. मात्र अनेक कामे पावसाळ्यापूर्वी अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना पून्हा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागण्याची चिन्ह दिसू लागली आहे.