शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जलाशये तहाणलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 22:03 IST

सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ७४ टक्के पाऊस : तलावांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक जलाशये कोरडी आहेत. धानाचे पीक निघण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यापुढचे दोन महिने पुरेसा पाऊस न झाल्यास धान पीक धोक्यात येऊन दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे मुख्य उत्पादन घेतले जाते. जवळपास दीड लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. धान पिकाला धानाच्या रोवणीपासून तर शेवटपर्यंत पावसाची गरज भासते. धानाला शेवटपर्यंत पाणी देण्यासाठी मामा तलाव, गाव तलाव, बोड्या बांधण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी या तलावांमध्ये साचविले जाते. सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण कमी होते. कडक ऊन पडण्यास सुरूवात होत असल्याने शेतकरी धान पिकासाठी तलावातील पाण्याचा उपयोग करतात. त्यामुळे धानाचे पीक निघण्यासाठी तलाव भरले असणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. मध्यंतरी पावसाअभावी रोवणीचे कामे थांबली होती. त्यावेळी शेतकºयांनी तलाव फोडून रोवणी केली होती. त्यामुळे तलावात साचलेला जलसाठा आणखी कमी झाला. काही तलाव आता ३० ते ४० टक्केच भरली आहेत. एवढ्या पाण्याच्या भरवशावर शेवटपर्यंत धान पिकाला पाणी पुरविणे अशक्य असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी पावसाने अगदी सुरूवातीपासून हुलकावणी देण्यास सुरूवात केली. त्यामुळे धानाच्या रोवणीची कामे आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत चालली. धानाचे पºहे टाकल्यानंतर ३० दिवसांच्या आत रोवणी झाल्यास धानाची वाढ होण्यास पुरेसा कालावधी उपलब्ध होतो व उत्पादन मिळते. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने धानाच्या रोवणीची कामे लांबली आहेत. परिणामी धानाच्या उत्पादनातही कमालीची घट येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला नाही तर तलावातील पाणी संपून धान पीक करपण्याचा धोका आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.रेगडी तलावात ६१ टक्केच जलसाठाचामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील तलाव हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून जवळपास ४० किमी अंतरावरील शेतीला जल सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकºयांचे लक्ष या तलावाकडे लागून राहते. हा तलाव दिना नदीवर बांधण्यात आला असल्याने पावसाळ्यात लवकरच भरतो. असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी हा तलाव आॅगस्ट महिना उलटला तरी अजूनपर्यंत भरला नाही.१ सप्टेंबरपर्यंत या तलावात केवळ ६१ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी १ सप्टेंबरला हा तलाव १०० टक्के भरला होता. रेगडी तलावाच्या अंतर्गत धान पिकाची शेती आहे. त्यामुळे जवळपास दोन महिने आणखी पाणी पुरवावे लागणार आहे. १०० टक्के तलाव भरला असला तरच दोन महिने पाणी पुरणार आहे. तलावाचा नहर सोडण्यात आला आहे. त्यामुळे तलावातील पाणी कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणे आवश्यक आहे.सोयाबिन, कापूस पीक जोमातचामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये सोयाबिन, कापूस पिकाचेही उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे सोयाबिन, कापूस पीक जोमात असल्याचे दिसून येत आहे. कापसाला डवरणी करण्याचे काम नुकतेच पार पडले आहे.