शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

जलाशये तहाणलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 22:03 IST

सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ७४ टक्के पाऊस : तलावांमध्ये निम्म्यापेक्षाही कमी पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक जलाशये कोरडी आहेत. धानाचे पीक निघण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यापुढचे दोन महिने पुरेसा पाऊस न झाल्यास धान पीक धोक्यात येऊन दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे मुख्य उत्पादन घेतले जाते. जवळपास दीड लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. धान पिकाला धानाच्या रोवणीपासून तर शेवटपर्यंत पावसाची गरज भासते. धानाला शेवटपर्यंत पाणी देण्यासाठी मामा तलाव, गाव तलाव, बोड्या बांधण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी या तलावांमध्ये साचविले जाते. सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण कमी होते. कडक ऊन पडण्यास सुरूवात होत असल्याने शेतकरी धान पिकासाठी तलावातील पाण्याचा उपयोग करतात. त्यामुळे धानाचे पीक निघण्यासाठी तलाव भरले असणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. मध्यंतरी पावसाअभावी रोवणीचे कामे थांबली होती. त्यावेळी शेतकºयांनी तलाव फोडून रोवणी केली होती. त्यामुळे तलावात साचलेला जलसाठा आणखी कमी झाला. काही तलाव आता ३० ते ४० टक्केच भरली आहेत. एवढ्या पाण्याच्या भरवशावर शेवटपर्यंत धान पिकाला पाणी पुरविणे अशक्य असल्याने शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.यावर्षी पावसाने अगदी सुरूवातीपासून हुलकावणी देण्यास सुरूवात केली. त्यामुळे धानाच्या रोवणीची कामे आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत चालली. धानाचे पºहे टाकल्यानंतर ३० दिवसांच्या आत रोवणी झाल्यास धानाची वाढ होण्यास पुरेसा कालावधी उपलब्ध होतो व उत्पादन मिळते. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने धानाच्या रोवणीची कामे लांबली आहेत. परिणामी धानाच्या उत्पादनातही कमालीची घट येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला नाही तर तलावातील पाणी संपून धान पीक करपण्याचा धोका आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे.रेगडी तलावात ६१ टक्केच जलसाठाचामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील तलाव हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव आहे. या तलावाच्या माध्यमातून जवळपास ४० किमी अंतरावरील शेतीला जल सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकºयांचे लक्ष या तलावाकडे लागून राहते. हा तलाव दिना नदीवर बांधण्यात आला असल्याने पावसाळ्यात लवकरच भरतो. असा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र यावर्षी हा तलाव आॅगस्ट महिना उलटला तरी अजूनपर्यंत भरला नाही.१ सप्टेंबरपर्यंत या तलावात केवळ ६१ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी १ सप्टेंबरला हा तलाव १०० टक्के भरला होता. रेगडी तलावाच्या अंतर्गत धान पिकाची शेती आहे. त्यामुळे जवळपास दोन महिने आणखी पाणी पुरवावे लागणार आहे. १०० टक्के तलाव भरला असला तरच दोन महिने पाणी पुरणार आहे. तलावाचा नहर सोडण्यात आला आहे. त्यामुळे तलावातील पाणी कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडणे आवश्यक आहे.सोयाबिन, कापूस पीक जोमातचामोर्शी, मुलचेरा, सिरोंचा, अहेरी या तालुक्यांमध्ये सोयाबिन, कापूस पिकाचेही उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊस कमी पडला. त्यामुळे सोयाबिन, कापूस पीक जोमात असल्याचे दिसून येत आहे. कापसाला डवरणी करण्याचे काम नुकतेच पार पडले आहे.