शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कारवाईसाठी मनपाला मुहुर्ताची प्रतीक्षा

By admin | Updated: February 13, 2015 01:30 IST

चंद्रपुरातील अवैध बांधकामाचा विषय आणि आयुक्त सुधीर शंभरकर यांची याविषयीची सडेतोड भूमिका, यामुळे मनपासोबत शहरातच चांगलेच वादळ उठले.

चंद्रपूर : चंद्रपुरातील अवैध बांधकामाचा विषय आणि आयुक्त सुधीर शंभरकर यांची याविषयीची सडेतोड भूमिका, यामुळे मनपासोबत शहरातच चांगलेच वादळ उठले. शहरातील नियमबाह्य कामे पडली जाऊन शहर सुटसुटीत होईल, अशी आशा चंद्रपूरकरांना होती. मात्र दोन महिन्यात कारवाई करण्याची घोषणा झाल्याला आता दीड महिना लोटला आहे. आता येत्या १५ दिवसात मनपा प्रशासनाला कोणता मुहुर्त हवा, असा उरफाटा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे करण्यात आली आहे. मंजूर नकाशा वेगळा आणि प्रत्यक्षात बांधकाम वेगळे, असा प्रकार मागील अनेक वर्षांपासून चंद्रपुरात बिनबोभाटपणे सुरू होता. हा सर्व प्रकार तेव्हाच नगरपालिकेला माहीत नसावा, असे नाही. मात्र या प्रकाराकडे तत्कालीन नगरपालिकेने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे अशी कामे चंद्रपुरात बऱ्यापैकी करण्यात आली. मात्र आता या अवैध बांधकामामुळे शहरात समस्या निर्माण होऊ लागल्यानंतर आणि नागरिकांची ओरड होऊ लागल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली. विशेष म्हणजे, ३० डिसेंबर २०१४ रोजी मनपाच्या सभागृहात झालेल्या आमसभेत नगरसेवकांनी अवैध बांधकामाचा विषय उचलून धरला होता. यापूर्वी नगरसेविका सुनिता लोढिया यांनी मनपाकडे तक्रारही दाखल केली होती. आमसभेत काही नगरसेवकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त सुधीर शंभरकर यांनी दोन महिन्यात अवैध बांधकामविरुध्द कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे सभागृह तेव्हा शांत झाले होते. आमसभेतील ही घोषणा प्रसार माध्यमाद्वारे लोकांपर्यंत आल्यानंतर चंद्रपूरकरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. चंद्रपूरचे महानगर होण्याच्या दृष्टीने हे पहिले आणि अत्यंत मोलाचे पाऊल ठरेल, असे वाटले होते. महानगरपालिका प्रशासनाने या कारवाईचा पहिला टप्पा ठरवित शहरातील २६ अवैध बांधकामाची यादी तयार केली. ही २६ बांधकामे टार्गेट ठेवून कालबध्द कार्यक्रम आखला होता. दरम्यानच्या काळात काही पदाधिकाऱ्यांकडून या कारवाईला विरोध करणे सुरू झाले. काही इमारतधारकांनी राजकीय शक्तीचाही आधार घेतला. त्यामुळे या कारवाईत पाहिजे तशी गती अजूनही आलेली दिसत नाही. आयुक्तांनी केलेल्या घोषणेला आता दीड महिन्याचा काळ लोटत चालला आहे. संबंधित बांधकामधारकांना नोटीस पाठविण्यापलिकडे मनपा प्रशासनाने कोणतीही कार्यवाही पुढे रेटलेली दिसत नाही. घोषणेवर विश्वास ठेवला तर आता प्रत्यक्ष कारवाईसाठी केवळ १५-२० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या दिवसात मनपा प्रशासन कोणता मुहुर्त साधणार वा त्या प्रतीक्षेत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)