शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पथदिव्यांअभावी गाव अंधारात

By admin | Updated: December 30, 2015 01:46 IST

स्थानिक नगरपंचायत निवडणुक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा त्या-त्या प्रभागातील उमेदवाराने मतदारांशी आपला संपर्क वाढविला आहे.

अस्वच्छतेने बेजार : नागरिकांना विकासाची अपेक्षासंघरक्षित तावाडे जिवतीस्थानिक नगरपंचायत निवडणुक अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसतसा त्या-त्या प्रभागातील उमेदवाराने मतदारांशी आपला संपर्क वाढविला आहे. मात्र भेटण्यासाठी आलेल्या उमेदवारांना प्रभागातील समस्यांबाबत नागरिक अवगत करीत असल्याचे चित्र येथे पहायला मिळत आहे. जिवती नगरपंचायत होण्याअगोदर सहा किलोमीटर अंतरावरील सारंगपूर हे गावसुद्धा जिवती गट ग्रामपंचायतीअंतर्गत येत होते. आता हे गाव नगरपंचायतीला जोडण्यात आले आहे. येथे प्रभाग क्रमांक पाच व सहा असे दोन प्रभाग पडले आहेत. असे असले तरी हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात जाण्यासाठी रस्ता असूनही तो नसल्यासारखाच आहे. या रस्त्यावरील गिट्टी ठिकठिकाणी उखडली आहे. सोबतच या गावात पाण्याची टंचाई असून गावात विजेचे खांब नाहीत. वस्तीतील रस्त्यांची कामे एक वर्षांपूर्वी करण्यात आली. परंतु आता संपूर्ण रस्ते उखडून गेले आहेत. पाण्याची समस्या सुटावी या हेतूने जलस्वराज्य योजनेतून विहीर बांधण्यात आली. पण कालांतराने ही योजनाच बंद पडली. प्रभाग सातमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छताच असल्याचे चित्र बघायला मिळते. येथे खांब तर आहेत, पण त्यावर पथदिवे नाहीत. आजपर्यंत ज्या समस्यांशी सामना केला, त्याचा या निवडणुकीनंतर तरी निपटारा व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. निवडून येणारा उमेदवार विकास कामे करणारा असावा, असी येथील मतदारांची अपेक्षा आहे. सारंगपूर येथे प्रभाग पाच व प्रभाग सहा असून या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा पक्षाचा प्रत्येकी एक-एक उमेदवार उभा आहे. काँग्रेसने मात्र या ठिकाणी आपला उमेदवार उभा केला नाही. प्रभाग पाच सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असून भाजपाचे रामराव चव्हाण तर राष्ट्रवादीचे केशव चव्हाण असे दोनच उमेदवार येथे उभे आहेत. प्रभाग सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव असून भाजपाकडून अनुसया राठोड तर राष्ट्रवादीकडून शेवंताबाई राठोड असे दोनच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रभाग सातमध्ये सर्वसाधारण महिला राखीव आहे. काँग्रेसकडून हेमलता तिडके, भाजपाच्या श्रद्धा वडेट्टीवार, राष्ट्रवादीकडून कविता झाडे तर बहुजन समाजपार्टीकडून चैत्राबाई गायकवड रिंगणात आहेत. या तिनही प्रभागातील उभ्या असणाऱ्या समस्या पाहता मतदारांचा कौल कुणाकडे जाणार, हा प्रश्न आहे.