शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

चार लाख ८१ हजार जनावरांना लाळखुरकत लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 6:00 AM

शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : जि. प. पशुसंवर्धन विभागाची १५ वी फेरी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जनावरांमध्ये आढळणाºया लाळखुरकत या संसंर्गजन्य गंभीर आजाराच्या निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १५ वी फेरी राबविण्यात आली. या फेरी अंतर्गत ३० ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील चार लाख ८१ हजार २१७ जनावरांचे लसीकरण करण्यात आले.शेतीला पूरक म्हणून शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून जनावरे पाळण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून काही शेतकºयांनी दुधाळी जनावरेही घेतली. या जनावरांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकते. हे लक्षात घेऊन लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागातर्फे घेण्यात आला. विशेषत: लाळखुरकत आजाराला प्रतिबंध केला नाही तर जनावरे दगावण्याचा धोका आहे. लाळखुरकत हा गंभीर आजार असून यालाच ग्रामीण भागात लाळे, पायखुरी व तोंडखुरी असेही म्हटले आहे. या आजारामध्ये तोंड व खुरात जखमा होतात. जनावर चारा खाणे बंद करतात. तोंडातून लाळ गळते, जनावरे चालताना लंगडतात, ताप येतो, थकवा जाणवतो व धाप लागते. यावर उपचार न झाल्यास जनावर मृत्यूमुखी पडण्याचा धोका आहे. शेतीच्या हंगामाची जनावरांचे कधी-कधी स्थलांतरही होते. अशा स्थलांतरीत जनावरांमुळे लाळखुरकत रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त वाढते. यावर तातडीने प्रतिबंध घातला नाही तर शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायाचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ होते. या रोगाला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून १५ व्या फेरी अंतर्गत ३० आॅक्टोबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद अंतर्गत श्रेणी- १ चे ३१, २ चे ११८ केंद्र तसेच ६ फिरत्या पशुचिकित्सा अशा १५५ केंद्रांत लाळ्खुरकतची लस उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ४ लाख ८१ हजार २१७ जनावरांचे यशस्वी लसीकरण करणे शक्य होऊ शकले.अशी घ्यावी जनावरांची काळजीसध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडत आहे. दिवसा कडक उन्ह तर सकाळी व रात्रभर कडाक्याची थंडी जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे जनावरांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव असतो. त्यामुळे योग्य पद्धतीचे खाद्य आणि स्वच्छ पाण्याबरोबरच जनावरांच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाळीव जनावरांना विशेषत: गाय, बैल, म्हशीला तोंड व पायांना जखमा होऊन लाळखुरकत रोगाची लागण होते. रोगाच्या प्राथमिक टप्यात जनावर अशक्त होते. खाद्यावरची त्याची इच्छा नाहीशी होते, अशी माहिती पशु चिकित्सकांनी दिली.उत्तम शेती करण्यासाठी पाळीव जनावरांची गरज आहे. शेतकºयांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी या जनावरांचा मोठा लाभ होतो. परंतु जनावरांचे आरोग्य बिघडल्यास याचा अनिष्ट परिणाम शेतकºयांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे लाळखुरकत रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेची १५ वी फेरी जिल्ह्यात यशस्वीरित्या राबवण्यात आली.- डॉ. अविनाश सोमनाथे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. प.

टॅग्स :doctorडॉक्टर