शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागाला ‘त्या’ अध्यादेशातून वगळले

By admin | Updated: July 29, 2014 23:44 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू करणे व शिक्षक भरती करणे असा अध्यादेश सर्वच क्षेत्रात सुरू झाला.

पेंढरी (कोके) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अनुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरू करणे व शिक्षक भरती करणे असा अध्यादेश सर्वच क्षेत्रात सुरू झाला. परंतु आदिवासी विभागाला आरटीई लागू करण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. आरटीई लागू करण्यासाठी शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र.प्राशातू-१११२/२५९/ २०१२ प्रा.शि-३, दि. १३ फेब्रुवारी २०१३ व शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. विभशा २०१३/ प्र. १७२/१/ विजाभज- २ दि. ७ जून २०१३ व १३ जून, २०१४ नुसार १ ते ४ वर्ग आहेत व एक किमीच्या आत ५ वा वर्ग नाही, अशा ठिकाणी ५ वर्ग व तीन किमीच्या आत आठवा वर्ग नाही, अशा ठिकाणी जिल्हा परिषद व समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत अनुक्रमे ५ वा व ८ वा वर्ग जोडण्याचे व त्यासाठी शिक्षक भरतीचे शासनाचे अध्यादेश आहेत. परंतु महाराष्ट्र शासनाच्या त्या अध्यादेशात राज्यातील आदिवासी विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे काही आदिवासी आश्रमशाळा संस्थापक मुख्याध्यापक व शिक्षक पुढील वर्ग सुरू करायचे की नाही, या संभ्रमात असून शिक्षक भरतीअभावी कर्मचाऱ्यांचे तथा बेरोजगारांचे नुकसान होत आहे.तसेच आरटीई २००९ नुसार इयत्ता १ ली ते ८ वीच्या प्रत्येक वर्गातील निवासी व अनिवासी (बहिस्त) विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गुणोत्तर प्रमाण सदर अधिनियमाचे परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये अतिरिक्त घोषित केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे व आवश्यकता असल्यास नवीन पदांचा प्रस्ताव शासनास सादर करावा. आश्रमशाळांना नवीन पदांना मंजुरी देऊ नये, असे अध्यादेशात स्पष्ट नमूद केले आहे. परंतु हा अध्यादेश शिक्षण विभाग व सामाजिक न्याय विभाग यांनाच लागू असल्यामुळे आदिवासी विभाग जीआरबाबत संभ्रमात पडला आहे. (वार्ताहर)