शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मालगाड्या थांबतात प्रवाशी रेल्वे फलाटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 6:00 AM

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर ५ फलाट आणि यार्ड पकडून १२ रेल्वेलाईन आहेत. दिल्लीकडील गाड्या फलाट क्रमांक एकवर आणि तेलंगणा, तामिळनाडूकडून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्या फलाट क्रमांक तीन व चारवर थांबविण्याचे वेळापत्रक आहे. या वेळापत्रकानुसारच प्रवासी गाडी पकडण्यासाठी फलाटावर जातात.

ठळक मुद्देबल्लारपूर रेल्वेस्थानक : गाडी आल्यास प्रवाशांची धावपळ

मंगल जीवने ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : मध्य रेल्वेचे शेवटचे प्रवेशद्वार म्हणून बल्लारशाह रेल्वेस्थानक प्रसिद्ध आहे. या स्थानकावरून दरदिवशी ३८ सुपरफास्ट गाड्या धावतात. परंतु काही महिन्यापासून नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच फलाटावर येत असल्यामुळे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते. शनिवारी तेलंगणा व राजधानी सुपरफास्ट गाडी नियोजित फलाटावर न येत दुसºयाच फलाटावर आल्याने मोठी त्रेधातिरपीट उडाली होती.बल्लारशाह रेल्वे स्थानकावर ५ फलाट आणि यार्ड पकडून १२ रेल्वेलाईन आहेत. दिल्लीकडील गाड्या फलाट क्रमांक एकवर आणि तेलंगणा, तामिळनाडूकडून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्या फलाट क्रमांक तीन व चारवर थांबविण्याचे वेळापत्रक आहे. या वेळापत्रकानुसारच प्रवासी गाडी पकडण्यासाठी फलाटावर जातात. परंतु फलाटावर गेल्यावर अमुक गाडी या फलाटावर येत नसून दुसऱ्या फलाटावर येत आहे, अचानक घोषणा केली जाते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होते. या धावपळीत ज्येष्ठ नागरिक सोबत असेल तर पूल चढून खाली फलाटावर येतपर्यंत गाडी सुटते. या रेल्वेस्थानकावर केवळ पाच मिनीटांचा थांबा आहे. प्रवाशांसोबत दिव्यांग व्यक्ती असल्यास हाल होतात. या समस्येबाबत रेल्वे अधिकारी उत्तर द्यायला तयार नाहीत. ५ फलाटावर १४ खानपान वस्तू विकणाऱ्यांचे स्टॉल आहेत. लाखो रुपये खर्चून हे स्टॉल घेण्यात आले. परंतु नियोजित फलाटावर गाडी थांबत नसल्याने व्यवसायच होत नाही, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.रेल्वेच्या प्रतीक्षेत होते पुलावर गर्दीरेल्वेगाड्या कुठल्या फलाटावर येणार, याचा बऱ्याच प्रवाशांना अंदाज आला. त्यामुळे सरळ फलाटावर न जात प्रवाशी पुलावरच उभे राहतात. गाडी येणार असल्याची उद्घोषणा झाल्यानंतर फलाटावर उतरतात. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका आहे.प्रवाशी म्हणतात...रेल्वे प्रशासन मालवाहू गाड्यांकडे विशेष लक्ष आहे. परंतु, रेल्वेस्थानकावरील ५ पैकी एकातरी फलाटावर मालगाडी हमखासपणे उभी राहते. या मालगाड्या दोन ते तीन तास फलाटावरच उभ्या राहत असल्याने सुपरफास्ट गाडी दुसऱ्या फलाटावर थांबविल्या जाते. हा प्रकार बºयाच दिवसांपासून सुरू आहे. मालगाड्या यार्डमध्ये का लाावल्या जात नाही. तासनतास या गाड्या नेमके प्रवाशी फलाटावर उभे ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :railwayरेल्वे