शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा उमेदवार नसल्याने जिल्ह्यातील २१ गावांमध्ये पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:52 IST

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर : अनेक ठिकाणी उपसरपंचाची निवडणूक होणार चंद्रपूर : निवडणूक विभागाने नुकतेच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. मात्र ...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर : अनेक ठिकाणी उपसरपंचाची निवडणूक होणार

चंद्रपूर : निवडणूक विभागाने नुकतेच सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. मात्र जिल्ह्यातील २१ गावांमध्ये आरक्षणानुसार निवडून आलेला सदस्यच नसल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यामध्ये सावली तालुक्यातील आठ, चिमूर तालुक्यातील पाच व ब्रह्मपुरी तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.

चिमूर तालुक्यातील सातारा, वाकरला, कोलारी, नवतला व साठगाव येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती महिला असे पडले आहे. मात्र या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षणात एकही जागा नव्हती. त्यामुळे विजयी उमेदवारात या प्रवर्गातील एकही महिला व पुरुष सदस्य नाही. सावली तालुक्यातील पारडी व मेहा बुज. येथील सरपंचपद अनुसूचित जाती महिला, लोंढोली, साखरी, बेलगाव, जीबगाव अनुसूचित जमाती महिला, व्याहाड बूज, वाघोली बुटी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. मात्र येथे या आरक्षणपदाचे उमेदवारच नसल्याने ओरड सुरू आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, जवराबोडी मेंढा, चांदली, रानबोथली, पारडगाव, रामपुरी, कोथुलना, कन्हाळगाव येथील सरपंचपदाच्या आरक्षणामुळे पेच निर्माण झाला आहे. गांगलवाडी, जवराबोडी मेंढा येथे अनुसूचित जाती महिला, चांदली, पारडगाव येथे अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले आहे. मात्र येथे या प्रवर्गाचा उमदेवारच नसल्याने मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.

बॉक्स

या गावांमध्ये पेच

चिमूर तालुक्यातील सातारा, वाकरला, कोलारी, नवतला व साठगाव, सावली तालुक्यातील पारडी, मेहा बुज, लोंढोली, साखरी, बेलगाव, जीबगाव, व्याहाड बूज, वाघोली बुटी, ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, जवराबोडी मेंढा, चांदली, रानबोथली, पारडगाव, रामपुरी, कोथुलना, कन्हाळगाव आदी गावांमध्ये सरपंचपदांमध्ये पेच निर्माण झाला आहे.

बॉक्स

राजुऱ्यात आरक्षणासाठी तहसीलदारांना निवदेन

राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आले आहे. त्यामुळे चुनाळावासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, आरक्षण बदलविण्यात यावे, या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन दिले. चुनाळा ग्रामपंचायतमध्ये सर्वसामान्य महिला आरक्षण १९९५ पासून १९९९, २०१० ते २०१५ अनुसूचित महिला आरक्षित होते. यंदासुद्धा महिला आरक्षण आल्याने नाराजी पसरली आहे. १३ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये सात महिला निवडूण आल्या आहेत. मात्र त्यापैकी एकही महिला सरपंच बनण्यास इच्छुक नाही.