शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

भरतीचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवाराचा नोकरीचा मार्ग मोकळा!

By राजेश मडावी | Published: January 30, 2024 5:44 PM

अखेर मंत्रालयातून धडकला आदेश; नोकर भरती प्रक्रियेतील तिढा सुटला : कार्यवाही करणाऱ्या वनाधिकाऱ्यांचा संभ्रम दूर.

चंद्रपूर : वन विभागातील भरतीसाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या मूळ दस्तऐवज तपासणी व शारीरिक मूल्यमापन सुरू असताना तृतीयपंथी उमेदवार समोर आल्याने अपात्र ठरणार काय, असा प्रश्न निर्माण झाला. भरती प्रक्रियेची कार्यवाही करणारे वन विभागाचे अधिकारीही पेचात सापडले. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. अखेर सोमवारी (दि. २९) राज्य शासनाच्या सचिवालयातून तृतीयपंथी उमेदवारांच्या मूल्यमापनाबाबत सूचना आल्या. ही माहिती तृतीयपंथी उमेदवाराला नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ‘त्या’ उमेदवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

वन विभागाच्या वतीने विविध पदांसाठी सध्या चंद्रपुरात भरती प्रक्रिया सुरू आहे. लेखी परीक्षेमध्ये ४५ पेक्षा अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांचे मूळ दस्तऐवज तपासणी व शारीरिक क्षमतेची मोजणी केली जात आहे. शारीरिक क्षमतेचे मोजमाप सुरू असताना पात्र उमेदवार म्हणून तृतीयपंथी उमेदवार समोर आला. या उमेदवाराची वर्गवारी कशी करावी, याकरिता संपूर्ण भरती प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी संभ्रमात सापडले होते. तृतीयपंथी उमेदवाराला ४५ पेक्षा अधिक गुण असल्याने त्याला परत केल्यास त्याच्यावर अन्याय होईल. उमेदवाराने याबाबत तक्रार केल्यास अंगलट येईल, या धास्तीने भरती कार्यवाही राबविणाऱ्या पथकाने वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला.

नेमके घडले काय ?

त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत राज्याच्या वनविभागाच्या सचिवांनी तृतीयपंथी उमेदवारांबाबत आदेश जारी केला. तृतीयपंथी उमेदवारांनी स्त्री व पुरुष संदर्भात स्वत:कडील सर्व कागदपत्रे सादर केली. त्यानुसार, त्याची शहानिशा करून त्या संवर्गामधून त्याची चाचणी घेण्याचे आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे पेच दूर झाला. तृतीयपंथी संवर्गातून एकच उमेदवार होता व एकच जागा तृतीयपंथी उमेदवारासाठी राखीव आहे. मंत्रालयातील आदेशानुसार, भरत प्रक्रियेची कार्यवाही झाल्याने तृतीयपंथी उमेदवाराला नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय