शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
3
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
4
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
5
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
6
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
7
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
8
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
9
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
10
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
11
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
12
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
13
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
14
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
15
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
16
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
17
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
18
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
19
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
20
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा

विनाकारण त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:36 AM

जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केला आहे. त्यामुळे येणाºया हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : नागपुरात घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप पिकाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये. विनाकारण शेतकऱ्यांना त्रास दिल्याचे लक्षात आल्यास संबंधित बँकेवर कारवाई केली जाईल. उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते नागपूर येथे आयोजित चंद्रपूर जिल्ह्याच्या खरीप आढावा बैठकीत बोलत होते.या बैठकीला राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अशोक नेते, आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आ. बाळू धानोरकर, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. काही बँकांच्या उद्दीष्टांपैकी फारच कमी कर्ज वाटप झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पीक विमा योजने संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार कमी रकमेचे धनादेश मिळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईविभागीय तलाठी प्रशिक्षण केंद्रातील रिक्त पदे लवकर भरण्यात यावे, काही ठिकाणी दोन वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही अधिकारी रुजू झाले नाहीत. त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.ग्रामसडक योजनेत जिल्ह्याची आघाडीमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेतली असल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. दुर्गम भागातील अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीbankबँक