शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

पाण्यासाठी गावकऱ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:31 IST

डोक्यावर सूर्य आग ओकत आहे. पारा ४७ अंशापार गेला आहे. तप्त उन्हामुळे आधीच खोलात गेलेले जलस्रोत आता तळ गाठत आहे. जिल्ह्यातील जवळजवळ पंधराही तालुक्यातील पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात तर गावकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.

ठळक मुद्देजलस्रोत कोरडे : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाणी टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डोक्यावर सूर्य आग ओकत आहे. पारा ४७ अंशापार गेला आहे. तप्त उन्हामुळे आधीच खोलात गेलेले जलस्रोत आता तळ गाठत आहे. जिल्ह्यातील जवळजवळ पंधराही तालुक्यातील पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात तर गावकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.मागील वर्षी पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे सर्व कामे आटोपून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत बसला. मात्र मृग नक्षत्रात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतरही पावसाने उशिराच हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसात शेतकºयांनी बि-बियाणे पेरले. त्यानंतर पावसाची गरज होती. मात्र त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकºयांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बºयापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. काही जणांची पिके सुकू लागली.यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला होता. नलेश्वर, चंदई, लभानसराड या प्रकल्पात जानेवारी महिन्यात पाहिजे तसा जलसाठा नव्हता. आता मे महिना सुरू आहे.पाण्याची पातळी खालावल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले. जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्प कोरडे पडायला लागले आहेत.आता उन्हाची तिव्रताही वाढत आहे. सूर्य आग ओकत आहे. तापमानाने उच्चांक गाठला आहे. ४७.३ अंशापर्यंत चंद्रपूरच्या तापनानो मजल मारली आहे. ग्रामीण भागातील जलस्रोट आटले आहे. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे.जिल्ह्यातील एकही गाव असे नाही की जिथे पाणी टंचाई नाही. अनेक गावे टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करीत आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाला त्यांची हाक ऐकू आलेली नाही.पहाडावर भिषण परिस्थितीजिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील नागरिक तर भिषण अवस्थेत जीवन जगत आहेत.आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. विशेष म्हणजे, या गुड्यातील नागरिकांना चक्क डबक्यातील पाणी पिऊन आपली व कुटुंबियांची तहान भागवावी लागत आहे. दरवर्षी हे विदारक चित्र समोर येते. मात्र संबंधित विभागाकडून यावर आजपर्यंत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे आता येथील नागरिकही आहे त्या परिस्थितीतच वेळ निभावून नेत आहेत.पाऊस लांबला तर...यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर आहे. पाऊसही सरासरीहून अधिक पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाची अपेक्षा आहे. या कालावधीत पावसाचे आगमन झाले नाही किंवा पाऊस लांबला तर मोठ्या अडचणी निर्माण होणार आहे. पाण्यासाठी तर नागरिकांना आताच दाही दिशा पालथ्या घालाव्या लागत आहे. पाऊस लांबला तर जिल्ह्यात भिषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.