शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 05:00 IST

जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादासंदर्भात आढावा घेताना खेमनार यांनी रविवारी सायंकाळी उच्चस्तरीय आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देसर्वत्र शुकशुकाट, रस्ते निर्मनुष्य : चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व गावात स्मशानशांतता, केवळ मेडिकल व पेट्रोलपंपच सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. विदेशातून आलेल्या एका रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. आता निगराणीत असणाऱ्या विदेशातून आलेल्या रुग्णांची संख्या ३१ आहे. १२ नागरिकांना १४ दिवसांचा अवधी झाल्यामुळे निगराणीबाहेर करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या जनता कफ्यूर्ला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. चंद्रपूरसह जिल्हाभरात ही संचारबंदी दिसून आली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने रात्री ९ वाजेपर्यंत असलेली ही जनतेची संचारबंदी वाढवून पहाटे ५ वाजेपर्यंत केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत जनतेने विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.जनता कर्फ्यूला मिळालेल्या प्रतिसादासंदर्भात आढावा घेताना खेमनार यांनी रविवारी सायंकाळी उच्चस्तरीय आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गेहलोत, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत असणारी आरोग्य यंत्रणेकडून औषध उपलब्धता व संभाव्य परिस्थितीत लागणारे उपकरणे औषधी यासंदर्भातला आढावा घेण्यात आला.सोमवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत. उद्या सकाळी ते विविध ठिकाणी पाहणी करणार आहे.दरम्यान रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गेहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात कालपर्यंत ४४ तर आज ३१ विदेशातून आलेले नागरिक निगराणीमध्ये आहेत. यामध्ये रविवारी बेल्जियमवरून आलेल्या एका नागरिकाची भर पडली आहे. सोबत रशिया आणि थायलंडवरून आठ जण आले आहे. त्याची तपासणी सुरू आहे. विदेशातून आलेल्या यापूर्वीच्या १२ लोकांनी १४ दिवस तपासणी पूर्ण केली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जिल्ह्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तथापि पुणे, मुंबई येथून आलेल्या सर्व प्रवाशांनी पुढील १४ दिवस घरीच आपल्या कुटुंबापासूनदेखील अलिप्त राहावे, आरोग्याबाबत कोणतीही शंका असल्यास अधिक माहितीसाठी व मदतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय ०७१७२-२७०६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.सोमवारपासून देखील पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यामध्ये १४४ कलम कायम लागू राहणार आहे. जमावबंदी लागू असल्यामुळे आवश्यकता असल्याशिवाय कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काळामध्ये जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात एकाच वेळी फवारणी करण्यासंदर्भातही कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत यांच्या ताब्यात असणाºया फवारणी यंत्रणा, फॉगिंग मशीन अद्ययावत ठेवण्याची, दुरुस्त ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. तेलंगणा-महाराष्टÑ राज्याची सीमा प्रतिबंधित करण्यात आली आहे.चंद्रपूर : सध्या देशात कोरोना व्हायरसने आपली पायमुळे रोवणे सुरू केले आहे. यावर आताच पायबंद बसविण्यासाठी व बाधितांची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेचा कर्फ्यू घोषित करीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. या आवाहनाला चंद्रपूर जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. चंद्रपुरातील सर्व रस्ते रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत निर्मुनष्य होते. बाजारपेठात स्मशानशांतता होती. मात्र चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एखादा नागरिक रस्त्यावरून फिरताना दिसला की पोलीस त्याला अडवून बाहेर पडण्याचे कारण विचारत होते.जनतेचे आभारशासनाने आवाहन केल्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने जनतेचा कर्फ्यू यशस्वी केला. यातून आपणाला सर्वांनाच फायदा होणार आहे. येणारा काळ कठीण आहे. त्यामुळे जनतेने पुढेही स्वयंशिस्त अशी कायम ठेवावी. संशयित आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी. - डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी, चंद्रपूरशिस्त पाळावीबाहेर राज्यातील कुणीही जिल्ह्यात प्रवेश करू नये, यासाठी आंतरराज्यीत सर्व सीमा बंद केल्या आहेत. केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाच जिल्ह्यात होऊ दिला जात आहे. शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.- डॉ. महेश्वर रेड्डी,जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या