शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोहीनूर तलावातील भाजीबाजारावरून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 6:00 AM

शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर मनपाने शनिवारपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांना कोहीनुर तलावात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तलावात चुन्याने चौकटीही आखून दिल्या.

ठळक मुद्देमनपाचा निर्णय ठरला वादग्रस्त । भरलाच नाही गंज वार्डातील भाजीबाजार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गंज वार्डातील किरकोळ भाजी विक्रेत्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कोहीनुर तलावात बाजार भरविण्याचा निर्णय मनपाने शुक्रवारी घेतला होता. मात्र, तापत्या उन्हात व्यावसायिकांसाठी कुठलीही व्यवस्था नसल्याच्या कारणावरून व्यावसायिक व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे मनपाचा निर्णय वादग्रस्त ठरला असून भाजीबाजारच भरला नाही. शहरातील शेकडो नागरिकांना भाजीपाल्याविना घरी परत जावे लागले.शहरातील गंजवार्डात अनेक वर्षांपासून भाजीबाजार भरत आहे. सकाळी ८ वाजतापासूनच या बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळते. संचारबंदी असतानाही बाजार सुरू असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वर्तविण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात सूचना दिल्यानंतर मनपाने शनिवारपासून किरकोळ भाजी विक्रेत्यांना कोहीनुर तलावात पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. तलावात चुन्याने चौकटीही आखून दिल्या. केवळ लिलाव करणाºयाना गाळेधारकांना विक्रेत्यांनाच सकाळी ९ वाजतापर्यंत गंजवार्डात व्यवसाय करण्याची मूभा देण्यात आली. मात्र, किरकोळ भाजीपाला विकता येणार नाही, अशा सूचना दिल्या. परंतु, किरकोळ विक्रेते माल उचलणार की नाही, या भीतीने बहुतांश गाळेधारक व्यावसायिकांनी शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले बाजारात थोक भाजीपाला खरेदी केला नाही. काही किरकोळ विक्रेत्यांनी सकाळी दुकाने लावण्याची तयारी करत असताना मनपा पथकाने ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देऊन गंजवार्डातून हुसकावून लावले. कोहीनुर तलावात जाण्याचे आवाहन केले. परंतु, त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी व्यवस्थाच नसल्याचा आरोप करून विक्रेते फिरकलेच नाही. दरम्यान, व्यवस्थेच्या कारणावरून सकाळी ११ वाजताच्या सुमारास काही विक्रेते व मनपा कर्मचाºयांमध्ये धक्काबुक्की झाल्याने भाजी बाजारच भरला नाही. त्यानंतर काही विक्रेत्यांनी रामाळा तलाव परिसरात दुकाने लावल्याचे दिसून आले.हातठेल्यांवरून शहरात भाजीपाला विक्रीगंजवार्डातील भाजीबाजार नियोजित कोहीनुर तलावात न भरल्याने बºयाच किरकोळ विक्रेत्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा जोतिबा फुले बाजारातून भाजीपाला खरेदी करून हातठेल्यावरून वार्डावार्डात विक्री करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार