शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धानाची आवक घटली

By admin | Updated: March 11, 2015 01:00 IST

केंद्र शासनाने तांदुळ निर्यातीवर बंदी घालताच त्याचा परिणाम राईस मिल उद्योगावर पडला आहे. यामुळे राईस मिल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून धानाची खरेदी-विक्री मंदावली आहे.

चंद्रपूर : केंद्र शासनाने तांदुळ निर्यातीवर बंदी घालताच त्याचा परिणाम राईस मिल उद्योगावर पडला आहे. यामुळे राईस मिल उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून धानाची खरेदी-विक्री मंदावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुुळे तांदुळ उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. याला जबाबदार केंद्र शासनाने केलेल्या बासमती तांदळावरील निर्यात बंदी आहे, बंदी होताच बाजार समिती मधील धान विक्री मंदावली व त्याच बरोबर धानाचे भाव ५०० ते ७०० रुपयाने घसरले आहेत.जिल्ह्यात सिंदेवाही, मूल, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी हे तालुके धान उत्पानात अग्रेसर आहेत. या तालुक्यात राईस मिलची संख्याही मोठी आहे. परंतु तांदूळ निर्यातीच्या बंदीमुळे राईस मिल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. धानाची विक्री कमी झाली, आणि दरही घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांनी धान खरेदी बंद केल्यामुळे बाजारात धानाची विक्री कमी होवू लागली आहे. आणि म्हणूनच धानाचे भाव घसरले. मागील वर्षी श्रीराम धानाला २२०० ते २४०० रूपये क्विंटल भाव मिळाला होता. परंतु यावर्षी १८०० रूपये दर मिळणेही कठीण झाले आहे. म्हणजे शासन निर्णय शेकतऱ्यांसाठी घातक ठरत आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना झाली नाही तर, शेतकरी तर आत्महत्या करतीलच पण राईस मिल मालकावरही ही वेळ येऊ शकते. (स्थानिक प्रतिनिधी)