शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्राने अडला रस्ता

By admin | Updated: December 13, 2014 01:17 IST

येथील रय्यतवारी रिट मधील जमिन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अधिग्रहीत केली. उर्वरित जमिनीवर शेतकरी शेती करीत आहे.

चंद्रपूर : येथील रय्यतवारी रिट मधील जमिन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अधिग्रहीत केली. उर्वरित जमिनीवर शेतकरी शेती करीत आहे. मात्र त्यांना जाण्यासाठी वीज केंद्राने रस्त्याच ठेवला नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. किमान शेतात जाण्यासाठी रस्ता करून द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्र्यांपासून तर प्रशासनापर्यंत सर्वांना निवेदन दिले आहे. मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नाही.
चांदा रय्यतारी रिठमधील हजारो एकर जमीन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने १९८० पूर्वी भूसंपादन केली. प्रकल्पाने भूसंपादन केल्यानंतर उर्वरित असलेल्या जमिनीवर शेतकरी शेती करून उपजिवीका करीत आहे. मात्र या शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याच नाही. त्यामुळे शेतात जायचे तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, एका बाजूने सेंट्रल रेल्वे लाईन आहे तर दुसऱ्या बाजूने महाऔष्णिक वीज केंद्रासाठी कोळसा व इतर माल वाहतूक करण्याकरिता रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतात बैलबंडी किंवा ट्रॅक्टरला जाण्यासाठी रस्ता नाही. दरम्यान शेतकऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री शोभाताई फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन रस्त्यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी प्रिकास्ट ब्रिज तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र सदर काम काही दिवसाताच बंद पडले. त्यानंतर पुन्हा या रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाकडे पायपीट सुरु केली आहे. मात्र अद्यापही रस्ता तयार करून देण्यात आला नाही. आता केंद्रात आणि राज्यात आपल्या शहरातील मंत्री असल्याने या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, चंद्रपूर वीज केंद्राच्या मुख्य व्यवस्थापकांना शेतकऱ्यांनी निवेदन देत रस्ता तयार करून देण्याची मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)