शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा-थेरगाव रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: October 9, 2015 01:44 IST

पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द-थेरगाव या मुळ मार्गाची प्रचंड दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

रस्त्यावर खड्डे : नागरिकांमध्ये प्रचंड संतापदेवाडा खुर्द : पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द-थेरगाव या मुळ मार्गाची प्रचंड दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या मार्गावर दररोज कुठे ना कुठे किरकोळ अपघात झाल्याची वार्ता कानी पडते. परंतु, लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सन २०१२ या वर्षी झालेल्या संततधार पावसामुळे थेरगाव रस्त्यावर असलेल्या अंधारी नदीच्या पुलासमोरील संपूर्ण डांबरीकरण उखडले. त्या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराला दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कुठलेच पाऊल उचलले नसल्याने या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास अनेक दुचाकीस्वार खड्ड्यात पडत असल्याच्या घटना घडत आहेत. थेरगाव येथे ९० टक्के आदिवासी समाज वास्तव्यास असून पोंभूर्णा येथे तहसील कार्यालय असल्याने त्यांना नेहमीच या रस्त्याने रात्री बेरात्री प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना सुद्धा रस्त्यावरील खड्यांमुळे सायकल चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तर याच गावातील अनेक शाळकरी विद्यार्थी देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालयात तसेच पोंभूर्णा येथे शिक्षण घेण्यासाठी सायकलने प्रवास करतात. त्यांना सुद्धा या खड्यांमुळे किरकोळ जखमा झाल्याचे बोलल्या जात आहे. थेरगाव नंतर चिंचाळा हळदी या मार्गावरील संपूर्ण डांबरीकरण उखडले असून त्याठिकाणी संपूर्ण रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने एस.टी. वाहक व खाजगी वाहकांना सुद्धा या मार्गावरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा त्रास प्रवाशांना होत असून जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. एवढी प्रचंड अवस्था होवून सुद्धा कोणताही अधिकारी व लोकप्रतिनिधीनी या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक पक्षाचे लोकप्रतिनिधी या रस्त्याने मते मागण्यासाठी फिरत होते. तेव्हा त्यांना या रस्त्याचे गांभीर्य दिसले नाही का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. या क्षेत्रातून निवडून आलेले आमदार सुधीर मुनगंटीवार जनतेच्या मतांच्या भरवशावर मंत्री झाले असून त्यांनी या रस्त्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष घालून सदर रस्ता तत्काळ दुरूस्त करून परिसरातील नागरिकांना होणारा नेहमीचा त्रास दूर करावा, अशी जनतेची मागणी आहे. याकडे लक्ष द्यावे. (वार्ताहर)