शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2016 00:50 IST

रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रुग्णालयाचे ...

दररोज शेकडो रुग्णांची नोंदणी : मूल येथे ११ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद रिक्तमूल : रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मूल येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करून १०० खाटांचे श्रेणी वर्धीत रुग्णालय दिले. मात्र आजच्या स्थितीत तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती येथे केलेली नसल्यामुळे अनेक रुग्णांची हेडसांड होत आहे. बहुतांश रुग्णांना रेफर टू चंद्रपूर, गडचिरोली केल्या जात आहे. त्यामुळे रूग्णांमध्ये रोष पसरला आहे.जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र आरोग्य विकास प्रकल्पांतर्गत येथील ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. तत्कालिन आरोग्य मंत्री डॉ. दिग्विजय खानविलकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा ५ मे २००२ रोजे मोठ्या दिमाखात पार पडला होता. यावेळी तत्कालिन आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव गायकवाड, तत्कालिन खासदार नरेश पुगलिया, तत्कालिन आमदार शोभाताई फडणवीस उपस्थित होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी सदर रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, शल्यचिकित्सक हे महत्त्वाचे पद नेहमीसाठी भरण्यात येईल, असे आश्वासन यावेळी दिले होते. परंतु १४ वर्षाचा कार्यकाळ लोटून गेला. मात्र बालरोग तज्ञ सोडले तर एकही तज्ञ डॉक्टरांची पदे येथे भरण्यात आलेली नाही. येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकाचा प्रभार डॉ. अनिल गेडाम यांच्याकडे मागील वर्षांपासून आहे. तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. देवेंद्र लाडे, डॉ. उज्वलकुमार इंदूरकर हे कर्तव्य बजावित आहे.मात्र तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांची तारांबळ उडत आहे. सदर रुग्णालयात रोज किमान ४०० ते ५०० च्या जवळपास रुग्णांची नोंदणी होत आहे. सदर रुग्णालयात आयुष क्लिनीक कार्यरत आहे. रुग्णांची संख्या पाहात आयुष मधील डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे. राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याच गृहक्षेत्रातील मूल येथील जिल्हा रुणालयाला डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदाचे ग्रहण लागलेले असूून त्यांनी पुढाकार घेत रिक्त पदांची समस्या तत्काळ सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)