शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 5:00 AM

विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले.

ठळक मुद्देइच्छाशक्ती वाढवा : १०६९ चाचण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने चाचण्यांचा वेग वाढविला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दुपटीने चाचण्या करण्यात येत आहेत. आता थोडेफार लक्षणे दिसत असतील तर नागरिकही स्वयंस्फूर्तीने चाचण्या करू लागले आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत ८५ हजार ४८४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील तब्बल ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले. यातील लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी केली जात होती. मात्र आता संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सर्वांच्याच चाचण्या केल्या जात आहे.कोरोना काळात आतापर्यंत बाहेरून चंद्रपूर जिल्ह्यात ९६ हजार ५३७ नागरिक दाखल झाले. या सर्वांना क्वारंटाईन केल्यानंतर ९६ हजार ४२ नागरिकांना काहीही लक्षणे नसल्याने मुक्त करण्यात आले. सध्या केवळ ४९५ नागरिक क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासनाची देखरेख आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ हजार ४८४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात ४१ हजार ८६० चाचण्या प्रयोगशाळेतून झाल्या तर ४३ हजार ६२४ चाचण्या अ‍ॅन्टिजेन प्रणालीद्वारे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चाचण्यांमधून तब्बल ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर आठ हजार ४९९ जणांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल यायचा असून ४०७ चाचण्यांबाबत संभ्रम आहे.संपर्कातून होत आहे संसर्गचंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असली तरी कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या