शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राज समितीसमोर होणार अधिकाऱ्यांची अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST

चंद्रपूर : घटनात्मक दर्जा असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ गठित २९ आमदारांच्या पंचायत राज समितीचे आज (दि. ९) सकाळी नऊ ...

चंद्रपूर : घटनात्मक दर्जा असलेल्या महाराष्ट्र विधानमंडळ गठित २९ आमदारांच्या पंचायत राज समितीचे आज (दि. ९) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे. ही समिती तीन दिवस (दि. ११ फेब्रुवारी) जिल्हास्थळी मुक्कामी राहणार आहे. दोन आठवड्यांपासून हाेमवर्क करणाऱ्या अधिकाऱ्यांना पंचायत राज समितीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. समितीच्या सरबराईसाठी जि. प. ने तातडीने १५ लाखांची तरतूद केली. शिवाय, कुठेही कमी पडू नये, याचीही डोळ्यात तेल घालून खबरदारी घेतल्याचे सोमवारी दिसून आले.

कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणे व राज्यघटनेत अंतर्भूत असलेली न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे गावपातळीवर आचरणात आणण्यासाठी सत्तेचे विक्रेंदीकरण करणे गरजेचे आहे. ग्रामीण जनतेला शासनाच्या कामकाजात सहभागी होता यावे, या उद्देशाने पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ मध्ये बलवंतराव मेहता समिती स्थापन केली. या समितीने २ ऑक्टोबर १९५९ राेजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पद्धती असावी, असा अहवाल शासनाला सादर केला. त्यानुसार महाराष्ट्रात १९६२ मध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात आल्या. जि. प. च्या कारभारावर विधिमंडळाचे नियंत्रण ठेवण्यासाठी २८ मार्च १९७३ रोजी विधानसभेत ठराव मंजूर करून विधानसभा व विधानपरिषद या दोनही सभागृहातील एकल संक्रमण मतदान व प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाच्या तत्त्वानुसार पंचायत राज समिती गठित करण्यात आली. मंगळवारी जिल्ह्यात आगमन होणाऱ्या समितीत २९ सदस्यांचा समावेश असून, आमदार संजय रायमुलकर हे समितीप्रमुख आहे.

समितीच्या कामाची गोपनीयता

पंचायत राज समितीचे कार्य गोपनीय असते. त्यामुळे त्या कामाचा अहवाल विधिमंडळ सभागृहात सादर होईपर्यंत उघड करता येत नाही. त्याबाबत सदस्यांना सभागृहात प्रश्नदेखील विचारता येत नाही. तपासणी संबंधात आवश्यक व्यक्तींना बोलाविण्याचा व त्याबाबत कागदपत्र, अभिलेख मागण्याचा अधिकार समितीला आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता, नियमांचे उल्लंघन आदींशी संबंधित जि. प. चे तत्कालीन अधिकारीही सोमवारी दाखल झाले आहेत.

हक्कभंग, अवमान तरतुदींमुळे अधिकारी धास्तावले

महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या तरतुदींच्या अधीन राहूनच समितीप्रमुख व समितीसमोर साक्षीदारांनी साक्ष नोंदवावी लागणार आहे. यासाठी साक्षीदारांनी आपल्या जागेवर बसताना किंवा जागेवरून उठताना वाकून आदर केला नाही तर अन्यथा हक्कभंग व अवमान होतो, अशी तरतूद आहे. त्यामुळे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.