शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकऱ्यांना तीन हजार रूपये पेंशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 01:09 IST

भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधाकर शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील उदरनिर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते. किंवा बहुताशी शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसते, अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान मानधन योजना। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना यापुढे तीन हजार रूपये मासिक पेंशन मिळणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधाकर शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील उदरनिर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते. किंवा बहुताशी शेतकºयांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध नसते, अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंतर्गत दरमहा तीन हजार रूपये निश्चित पेन्शन देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छीक व अंशदायी पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत भारतीय जीवन बीमा निमगव्दारे पेंशन फंडाव्दारे नोंदणीकृत पात्र शेतकºयांना पेंशन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वर्ष या वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नोंदणी करण्यासाठी पात्र आहेत. या योजनेंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकºयांना त्याचे १ ऑगस्ट २०१९ रोजीच्या वयानुसार ५५ ते २०० रूपये प्रतिमाह मासिक हप्ता वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत पेंशन फंडमध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पेंशन फंडमध्ये जमा केलेल्या मासिक हप्ताइतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकºयांच्या पेंशन फंडमध्ये जमा करणार आहे.अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी पती-पत्नी स्वतंत्रपणे योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. त्यांच्या स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्रपणे तीन हजार रूपये मासिक पेंशन मिळणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या पात्र शेतकºयाला योजना बंद करायची असल्यास त्यांची जमा रक्कम व्याजासह परत मिळणार आहे.या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकºयांनी सेवानिवृत्ती तारखेपूर्वी आकस्मित निधन झाल्यास त्या व्यक्तीचे ६० वर्ष वयापर्यंतचे उर्वरित मासिक हप्ते पती-पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करून त्या व्यक्तीचे पेंशन खाते चालु ठेवू शकतात. सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधीन झालेल्याच्या वारसदारांना रक्कम मिळणार आहे.यांना मिळणार नाही योजनेचा लाभराष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना(ए.पी.एस.) कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनाझेशन स्किम,यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी, कामगार आणि रोजगार मंत्रालयाव्दारे प्रशासित प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन योजनातील पात्र शेतकरी, उच्च आर्थिक स्थितीत असलेले म्हणजेच प्रधानमंत्री किसान माधन योजना या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील, जमीन धरण करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारी केलेली व्यक्ती, माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे माहापौर व जि. प. अध्यक्ष, शासकीय कर्मचाºयांनी यांना लाभ मिळणार नाही.

टॅग्स :agricultureशेती