शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील शाळांच्या कर्मचाऱ्यांना १२ वर्षांपासून अनियमित वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:29 IST

नितीन मुसळे सास्ती (चंद्रपूर) : आदिवासी उपयोजना क्षेत्रात असलेल्या शाळांचा दर्जा सुधारावा व माध्यमिक शिक्षणाचा समतोल विकास साधता यावा ...

नितीन मुसळे

सास्ती (चंद्रपूर) : आदिवासी उपयोजना क्षेत्रात असलेल्या शाळांचा दर्जा सुधारावा व माध्यमिक शिक्षणाचा समतोल विकास साधता यावा व विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या शाळांना अनुदान मिळणे सुलभ व्हावे, याकरिता शासनाने २००८ मध्ये राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील ४५ शाळांना अनुदान मंजूर केले. परंतु या शाळातील कर्मचाऱ्यांना तब्बल १२ वर्षे लोटूनही नियमित वेतन मिळत नसल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

शासनाने राज्यात २०००-०१ पासून राज्यातील जवळपास ४५ शाळा व काही तुकड्यांना आठ वर्षांनंतर ३० मे २००८ व ११ फेब्रुवारी २००९ च्या शासन निर्णयानुसार अनुदान मंजूर केले. या शाळांतील कर्मचाऱ्यांना डिसेंबर २००८ पासून वेतन मिळणे सुरू झाले. या सर्व शाळा शालेय शिक्षण विभागाच्या असल्या, तरी या शाळांतील कर्मचाऱ्यांना वेतन मात्र आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत दिले जाते. परंतु आदिवासी विभाग शालेय शिक्षण विभागाला नियमित वेतन वितरित करीत नसल्यामुळे या शाळांतील कर्मचाऱ्यांना तब्बल १२ वर्षांपासून वेतनाच्या अनियमिततेचा फटका बसत आहे. सद्यस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील अशा पाच शाळा व काही तुकड्यांचे मे महिन्यापासूनचे वेतन थकित असून, कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

अशा आदिवासी उपयोजना क्षेत्रातील ४५ शाळा प्लॅनमधून नॉनप्लॅनमध्ये घेणे गरजेचे आहे. यापूर्वी अशा पद्धतीची कार्यवाहीसुद्धा झालेली आहे. परंतु २००८ पासून अनुदान मंजूर झालेल्या या ४५ शाळा नॉनप्लॅनमध्ये घेण्याची कार्यवाही शासन दरबारी रखडलेली आहे.

बाक्स

शिक्षक आमदारांच्या पत्रालाही हुलकावणी

शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याकरिता शिक्षक आमदारांचा मोठा वाटा असतो. त्याकरिता कर्मचारी आपली व्यथा शिक्षक आमदारांपुढे मांडतो व ते शासनापर्यंत माहिती पोहोचवून समस्या निकाली काढली जाते. परंतु या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची समस्या मात्र तब्बल १२ वर्षे लोटूनही दूर होत नसल्याचे दिसून येत आहे. या १२ वर्षांच्या काळात अनेक मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, आदिवासी मंत्री बदलून गेले. या सर्वांना या समस्येबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला; परंतु समस्या निकाली निघाली नाही. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे विधान परिषद सदस्य नागो गानार यांनीसुद्धा पत्राद्वारे याकडे लक्ष वेधले. परंतु शासनाने या पत्राचीही दखल घेतली नाही.