शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे. आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आणि बेंगलोर ही शहरेसुद्धा आज पाणीटंचाईने संकटात सापडलेली आहेत.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : लोकसभेचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीसुद्धा देशातील मोठी शहरे आज तहानलेलीच आहे. त्यामुळे शासन रखडलेले सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, असा प्रश्न चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी लोकसभेचे प्रश्नोत्तराच्या तासात मांडला.देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे.आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आणि बेंगलोर ही शहरेसुद्धा आज पाणीटंचाईने संकटात सापडलेली आहेत. कृषिप्रधान भारताची अर्थव्यवस्था मान्सूनच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आज या मोठया शहारांसह ग्रामीण भाग सिंचनाच्या अभावामुळे पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे.शेतकऱ्यांच्या पिकांवर त्याचा विपरित परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढल्या असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.चंद्रपूर जिल्ह्यात लोअर पैनगंगा, गोसेखुर्द यासारखे मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत.मात्र राज्यातील सरकारच्या नियोजनशून्यते मुळे हे प्रकल्प अपूर्ण आहेत. ते केव्हा पूर्ण होणार याची माहिती शासनाने सभागृहाला द्यावी, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. याशिवाय समुद्राचे पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याची काही योजना शासनाची आहे काय, याबद्दलही खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारले. शासनाने नद्यांवर बंधारे बांधण्याची योजना असल्यास जलसिंचनाची समस्या सुटू शकेल आणि दुष्काळावर मात करता येईल, असे ते म्हणाले. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे ख्नासदार बाळू धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.