शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

जिवतीतील कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अ‍ॅलर्जी

By admin | Updated: February 1, 2015 22:54 IST

अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या जीवती तालुक्यातील शासकीय कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी न राहता ‘अप-डाऊन’ करीत असल्याने तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे.

जिवती: अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या जीवती तालुक्यातील शासकीय कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी न राहता ‘अप-डाऊन’ करीत असल्याने तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे. तालुक्याच्या निर्मितीला १३ वर्षे लोटली आहेत. मात्र जिवती तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात विकास कामे झाली नाहीत. तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयातील विविध विभागातील पदे रिक्त आहेत. त्यातच कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. यामुळे विकासाला गती मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून जनतेला नियमित सेवा द्यावी, वेळेवर जनतेची कामे व्हावीत, यासाठी शासनाने प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश जारी केले असले तरी कुठल्याच विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची स्थिती आहे. याला कार्यालयातील मुख्य अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहेत. स्वत: अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचारी मुख्यालयी कसे राहतील, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. तालुक्यातील महसूल विभागात तहसीलदार, अन्न पुरवठा अधिकारी व एक-दोन लिपीक व शिपाई वगळता अन्य कोणतेच कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. बांधकाम विभाग, वनविभाग, कृषी विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पंचायत समिती, तलाठी व ग्रामसेवकांची कार्यालये असली तरी कोणत्याच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे जनतेची कामे वेळेवर कधीच होत नाहीत. परिणामी नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. अनेक अधिकारी कर्मचारी तर मिटींगच्या नावाखाली वारंवार सुट्या घेतात. आठवडा-आठवडा कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबून राहतात. आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य केंद्रातही हीच परिस्थिती आहे. कधी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही तर कधी परिचारिका बेपत्ता असते. हा प्रकार नेहमीचाच असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात शिक्षण विभागही मागे नाही. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्यासह शिक्षकही मुख्यालयी राहण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवितात. परिणामी तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासाळली आहे. महिनोगंती अधिकारी शाळा भेटीसाठी येत नाहीत. त्यामुळे शिक्षकांवर कुणाचेही नियंत्रण नाही. ते शिकविण्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. डाक पोहोचविणे, मिटिंग इत्यादी कामाचा बहाणा करुन निघून जातात. त्यामुळे अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना लिहिता, वाचता येत नाही, कधी पालक भेटीही होत नाही. (तालुका प्रतिनिधी)