शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे पॅकेज द्या

By admin | Updated: December 11, 2014 23:04 IST

राज्यामध्ये अल्पप्रमाणात पाऊस पडल्यामुळे १९७२ पेक्षाही मोठ्या प्रमाणात भयावह अशी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. धान, सोयाबीन, कापूस आदी पिके पुर्णत: उद्धवस्त झाले

चंद्रपूर : राज्यामध्ये अल्पप्रमाणात पाऊस पडल्यामुळे १९७२ पेक्षाही मोठ्या प्रमाणात भयावह अशी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. धान, सोयाबीन, कापूस आदी पिके पुर्णत: उद्धवस्त झाले असून शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी खरीप हंगामातील नुकसानीबाबत शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपये व रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना किमान २५ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेतील सभागृहात दुष्काळाच्या चर्चेवर बोलताना केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता शेतकऱ्यांची भूमिका आपणासमोर मांडत आहे. गेल्या तीन वर्षांत शेतकऱ्यांना दुष्काळी संकटाला समोर जावे लागत आहे. यावर्षी तर भयानक परिस्थिती आहे. अल्प पावसामुळे सोयाबीन, धान, कापूस, ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुबार तिबार पेरणी केली. परंतु अल्प पावसामुळे संपुर्ण पिके उदध्वस्त झालीत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये सिंचनाअभावी वर्षातून फक्त एकदाच पिक घेण्यात येते. परंतु अल्प पावसामुळे याही जिल्ह्यातील पिके हातची गेल्याने नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना या चारही जिल्ह्यात घडत आहेत. हिच परिस्थिती कापूस, सोयाबीन पिकविणाऱ्या जिल्ह्यात सुद्धा असुन दररोज किमान तीन ते चार शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गेल्या चार महिन्यात आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
उत्पादन कमी होऊनही भाव अल्पच
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले तर यावर्षी कमी प्रमाणात उत्पादन होवून सुध्दा भाव मिळत नसल्याने शेतकरी पुर्णत: हवालदिल झालेला आहे. त्यामुळे धान, सोयाबिन, कापूस, ऊस या भागातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी. सोयाबिन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी.
तसेच सोयाबिन, धान, कापूस पिकविणाऱ्यांना खरीप हंगामासाठी ५० हजार रुपयांचे तर रब्बी हंगामासाठी २५ हजार रुपयांचे पॅकेज देण्यात यावे. शेतकऱ्यांवर असलेले पीक कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. (प्रतिनिधी)