शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहासाठी मुलींनाही हवा आता जमीनधारक पती

By admin | Updated: December 25, 2015 00:24 IST

विवाह हा प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा क्षण. आपल्या मुलीला भावी आयुष्याचा चांगला जोेडीदार मिळावा ही प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते.

मुलाकडे सातबाराची अट : बदलत्या काळात विवाहाचे संदर्भही बदललेप्रकाश काळे गोवरीविवाह हा प्रत्येकांच्या आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा क्षण. आपल्या मुलीला भावी आयुष्याचा चांगला जोेडीदार मिळावा ही प्रत्येक आई- वडिलांची इच्छा असते. मुलगी सुखा- समाधानात राहावी यासाठी पिलाची धडपत सुरू असते. मात्र हे सारे पाहताना मुलाकडे जमिनी एक तुकडा असावा अशी अट मुलींनीही घातली असल्याने बदलत्या काळात विवाहाचे संदर्भही बदलत चालले आहे.विवाह म्हटला तर आनंदाची पर्वणीच लग्नातील माहोल हा अनेकांना वेगळाच आनंद देऊन जातो. पूर्वी लग्नाची पद्धत वेगळी होती. आई- वडिलांच्या पसंतीवरच मुलीच्या भावी जोडीदारासोबत साता जन्माची रेशमी गाठ बांधावी लागत होती. त्यावेळी मुलीची पसंती विचारात घेतली जात नव्हती. आई-वडिलांनी जो वर निवडला आहे, त्याच्याशी लग्न लावून दिल्या जात होते. मुलगीही वडिलांच्या शब्दाबाहेर जात नसल्याने दिल्या घरी सुखी राहत होती. मात्र आज काळ बदलला. या काळासोबत विवाहाचे संदर्भ बदलत चालले आहेत. व्हॉटसअ‍ॅप फेसबुकच्या जगात तरुणाईचे भावविश्व वेगळे आहे. आपली मुलगी आयुष्यभर सुखात राहावी हे प्रत्येक आई- वडिलांचे स्वप्न असते. मात्र बदलत्या काळात मुलींच्याही भावनांचा विचार करीत तिला तिच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याची संधी घरच्यांनी दिली आहे. विवाहासाठी सज्ज झाल्यानंतर मुलांचे घरदार, नोकरी याला पहिली पसंती असायची. परंतु मुलांकडे आता घरदार, संपत्ती आणि नोकरीच असून चालत नाही. तर त्याच्याकडे जमिनीचा कोरभर तुकडा असावा, असा मानस आज व्यक्त होत असल्याने नोकरीसोबत मुलांकडे सातबाराची अट मुलींकडून घातली जात आहे. तुळशी विवाहानंतर विवाहासाठी, साक्षगंध व पाहणीचे कार्यक्रमाचे मोठ्या लगबगीने पार पाडले जात आहे. मुलाकडील व मुलींकडील मंडळ पाहणीच्या कार्यक्रमात व्यस्त झाली आहेत. मुलगी आयुष्यभर सुखात राहावी. यासाठी वधूपित्याची धडपड चालली आहे. विवाह एकदाच होत असल्याने मुलींसाठी चांगले स्थळ पाहण्यासाठी सुरुवात झाली आहे.लग्न जुळवून बऱ्यापैकी आता लग्नालाही सुरुवात झाली आहे. भावी जोडीदारासोबत विवाह करण्यासाठी मुलींची पसंती आता विचारात घेतली जात आहे. त्यामुळे काळाच्या ओघात लग्नाची प्रक्रीया हळूहळू बदलत जात आहे. भावी जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मुलींना मिळाले असले तरी घरातील वडिलाच्या शब्दाबाहेर मुलगी आजही जात नाही, हे वास्तव आजही कायम आहे. लाडात वाढविलेली लेक परक्या घरी देताना मुलगी आयुष्यभर सुखात राहावी हिच आई- वडिलांची माफक इच्छा असते. मुलाकडील किंवा मुलीकडील घराणेशाहीला आजही तितकीच पसंती दिली जाते. घराणेशाहीच्या बळावर आजही विवाह उरकले जाते. ही पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा कायम आहे.काळ बदलल्याने काळासोबत माणसाला बदलावे लागते. हा एक नियम आहे. त्यानुसार विवाह सोहळ्यातही मोठ्या प्रमाणात अमुलाग्र बदला झाला आहे. आजच्या काळात नोकरी आणि विवाह हे समीकरण तयार झाले आहे. परंतु नोकरीसोबतच मुलांकडे जमिनीचा सातबारा असावा हा नवा विचार जनमानसात चांगला रुढ होत चालला आहे. त्यामुळे भावी नववधू, भावी वराकडे सातबारा असावा अशी अट घालत असल्याचे चित्र समाजात पहायला मिळत आहे.