शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 14:13 IST

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ३७२ गावांमधील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. जिल्ह्यात ३२६ नळयोजना अस्तित्वात असल्या तरी ४६ गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही उपाययोजना नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्षगावकऱ्यांना विविध आजाराची लागण

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ३७२ गावांमधील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. जिल्ह्यात ३२६ नळयोजना अस्तित्वात असल्या तरी ४६ गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही उपाययोजना नसल्याची माहिती आहे.फ्लोराईडयुक्त गावांचे सन २०१४-१५ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावे आढळून आली. या गावातील स्रोत्रातून येणारे पाणी फ्लोराईडयुक्त असल्याने ते पिण्यास अयोग्य आहे. एवढेच नाही तर विविध आजारांना आमंत्रण देणारे आहे. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने दात पिवळे पडणे, सांधेदुखीचा त्रास होणे, हातपाय नेहमी दुखणे अशाप्रकारचे अनेक आजार होतात.या गावांना निदान पिण्यासाठी तरी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहे. मात्र असे असले तरी ४६ गावे अद्यापही शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. २८ गावात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलस्वराज्य-२ अंतर्गत योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे आणि १८ गावात योजना प्रस्तावित केल्याचे पाणीपुरवठा विभाग सांगत आहे. मात्र या गावांना प्रत्यक्षात शुद्ध पाणी केव्हा मिळेल, याबाबत कोणीही सांगू शकत नाही.नवानगरचा संघर्षनागभीड तालुक्यातील नवानगर हे गावही फ्लोराईडयुक्त आहे. सतत फ्लोराईडयुक्त पाणी पित असल्याने नवानगरचे नागरिक विविध आजारांचे बळी ठरत आहेत. आम्हाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावकऱ्यांचा २००५ पासून संघर्ष सुरू असला तरी त्यांना अद्यापही शुद्ध पाणी मिळाले नाही. परिणामी त्यांना फ्लोराईडयुक्तच पाणी प्यावे लागत आहे. येथील नागरिकांनी आतापर्यंत सर्वच अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे उंबरटे झिजवले. पण गेल्या १३ वर्षात त्यांची मागणी कुणीच पूर्ण करू शकले नाही.जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग ३२६ गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याकरिता नळयोजना अस्तित्वात असल्याचे सांगत आहे. मात्र यात शंका असून नळयोजनांचा अनुभव लक्षात घेता त्या केवळ अस्तित्वातच असाव्यात. किती गावांना प्रत्यक्षात पाणी मिळत आहे, याची सविस्तर माहिती आपण पाणीपुरवठा विभागाला मागणार आहे.- संजय गजपूरेजि.प.सदस्य, चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणी