शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

पिकासाठी रात्रभर जागतात शेतकरी

By admin | Updated: November 8, 2014 01:00 IST

शेतकऱ्याचे संपूर्ण पीक घरात येईपर्यंत चांगले पिक झाले, असे विश्वासाने सांगता येणे सद्यस्थितीत कठीण झाले आहे.

सास्ती : शेतकऱ्याचे संपूर्ण पीक घरात येईपर्यंत चांगले पिक झाले, असे विश्वासाने सांगता येणे सद्यस्थितीत कठीण झाले आहे. शेतकरी दादा कुण्या ना कुण्या संकटात सापडून त्याचे सर्व बाजूने नुकसानच होताना दिसून येत आहे. कधी जास्त पाऊस आल्याने तर कधी कमी पाऊस आल्याने नुकसान, कधी लष्करी अळी तर कधी गारपीट, याव्यतिरिक्त आता शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे झाले आहे. शेतातील उभे पीक तर सोडाच पण कापणी करुन ठेवलेल्या पिकावरसुद्धा रानटी जनावरांनी हल्ला चढवून नुकसान करणे सुरू केले आहे. त्यामुळे पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांला थंडीतही अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे.कृषिप्रधान देशातील शेतकरी कायमच संकटात सापडलेला दिसून येत आहे. यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी अहोरात्र काबाडकष्ट करुन उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु निसर्गाच्या प्रकोपापुढे त्याचे काहीच चालत नाही. कुण्या ना कुण्या कारणाने त्याला अपयशच येत असते. शासनही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच सोईसुविधा उपलब्ध करुन देते. परंतु त्याचाही फायदा होत नाही. शेतकरी दादा नेहमीच संकटात सापडून हवालदील झालेला असतो.पिकाच्या पेरणीपासूनच त्याला संकटाला समोरे जावे लागते. मशागतीनंतर पावसाअभावी पेरण्या खोळंबतात. कशाबशा पेरण्या झाल्या की पाऊस बेपत्ता झाल्याने दुबार पेरणीचे संकट येते. पेरणी झालीच तर मोठा पाऊस होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. या सर्व संकटातून सावरतो न सावरतो तोच लष्करी अळी किंवा इतर रोगांमुळे नुकसान सुरु होते. हे सर्व झाल्यावर अकाली पाऊस, गारपीट याची भीती असते. याव्यतिरिक्त परिसरातील प्रदूषणामुळे शेतीचे नुकसान होते. या सर्व संकटातून पिकाचे रक्षण करता करता शेतकरी पूर्णत: खचून जातो. परंतु त्याचे संकट काही संपल्या संपत नाही. या सर्व संकटानंतर येणारे संकट म्हणजे रानटी जनावरांचा धुमाकूळ. उभ्या पिकावर हल्ला करुन पिकाचे नुकसान केले जात आहे. पिकांची कापणी करुन शेतात ठेवलेल्या पिकावरही हल्ला सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी दादा कडाक्याच्या थंडीतही आपल्या शेतातील पिकांचे रक्षण करण्याकरिता अख्खी रात्र जागून काढत आहे.जंगल क्षेत्र लागून असलेल्या शेतात जर जीव धोक्यात घालून रक्षण करावे लागते. पिकाच्या रक्षणासाठी शेतात थंडीत अख्खी रात्र जागावी लागते. जंगली जनावरे अन्न व पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेऊन शेतात असलेल्या पिकावर हल्ला करुन आपले पोट भरण्यापेक्षा नुकसान जास्त करीत आहे. कापून ठेवलेल्या धानाच्या गंजीवर हल्ला करुन नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मात्र प्रशासन लक्ष देत नाही. जनावरांच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा मिळत नाही. किंवा यावर नियंत्रण म्हणून कोणतीही उपाययोजना केली जात नाही, हे विशेष. (वार्ताहर)