शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

धान पीक पाण्याअभावी वाळले

By admin | Updated: October 28, 2014 22:53 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या

नवरगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. परंतु निसर्गांच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी नागविल्या जात आहे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. पाण्याअभावी धान पिक वाळत आहे. त्यामुळे शेतकरी धानाची पात कापून गुरांना चारा टाकत आहे.यावर्षी पावसाने जून-जुलै मध्येच पाठ फिरविली. त्यानंतर पाऊस आला आणि शेतकरी शेतीच्या कामाला लागले. कशीबशी धान रोवणीची कामे केली मात्र निसर्गाने पाठ फिरविली. सिंदेवाही तालुक्यात भात (धान) पीक हे मुख्य असून संपूर्ण शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतकरी धान पीक घेतो आणि त्यावरच कुटुंबाची गुजराण करतो. मुलांचे शिक्षण औषध दवाखाना आदी सर्व खर्च शेतीतून आलेल्या पिकांवरच करावा लागतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी शेतकऱ्याचे कंबरडे मोडत आहे. त्यातच शासनही शेतपिकांना योग्य भाव देत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.यावर्षी निसर्गाने पाठ फिरविली असल्याने शेती संकटात सापडले आहे. नवरगाव परिसरातील शेतकऱ्यांना घोडाझरी नहर यावर्षी लवकर बंद झाल्याने शेतातील धान धोक्यात आले आहे. काही शेतकऱ्यांची धानाची पाल झाल्याने कापूस बैलांना चारत आहेत तर काही शेतकरी इकडून तिकडून पाणी विकत घेऊन शेती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. घेतलेले कर्ज कसे फेडायचे अशा विंवचनेत शेतकरी सापडला आहे. त्यातच काही धान शेतीला विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. एकूणच शेतकऱ्यांची दैनावस्था झाली आहे. आता तरी शासनाने शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)