शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्ती योजना परत सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

फोटो बल्लारपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकार कधी पडेल, याचे स्वप्न भाजपने चार वर्षांपर्यंत बघत ...

फोटो

बल्लारपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकार कधी पडेल, याचे स्वप्न भाजपने चार वर्षांपर्यंत बघत राहावे, असा भाजपला टोला लगावत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारच्या भविष्यात काय लोकोपयोगी योजना आहेत, असे सांगत बंद पडलेली तंटामुक्त योजना परत सुरू करणार असल्याची घोषणा केली.

तसेच महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रकरण एका महिन्याच्या आत निपटवून गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याची तरतूद केली जात असून, त्याकरिता शक्ती कायदा तयार करण्याकरिता सर्वपक्षीय २१ आमदारांची एक समिती गठीत केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

येथील बालाजी सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. बाबासाहेब वासाडे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुड्रे, राकाँचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दीपक जयस्वाल, शहर अध्यक्ष बादल उराडे, बेबीताई उईके, नितीन भटारकार, महादेव चिंचोलकर मंचावर उपस्थित होते.

अनिल देशमुख पोलीस भरतीबाबत माहिती देत पुढे म्हणाले, राज्यात साडेबारा हजार पोलीस भरती होणार असून, त्यातील पाच हजार पोलिसांच्या भरतीचे काम सुरू झाले आहे. राज्यातील तरुण - तरुणींसाठी नोकरीची ही फार मोठी संधी आहे. कोरोना काळात नोंदवलेले गुन्हे नोंदविले जाणार. काँग्रेस व राकाँची युती असूनही चंद्रपूर जिल्ह्यात आमदारांची तिकीट देताना राकाँला नेहमीच डावलले जाते. या घडीला तसे होणार नाही. जिल्ह्यातून युतीमधून राकाँकरिता दोन जागा नक्कीच घेऊ, असे आश्वासन त्यांनी राकाँ कार्यकर्त्यांना दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्यांचा देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राजेंद्र वैद्य यांनी केले. संचालन संजय वैद्य यांनी केले.

बॉक्स

भाजयुमोकडून देशमुख यांना काळे बॅनर दाखविले

शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख बल्लारपूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जात असताना येथील भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बसस्थानक परिसरात भाजयुमोचे जिल्हा युवा अध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी त्यांना काळे बॅनर दाखविले व सरकारच्या धोरणाचा निषेध केला.