शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पटावरील बंदी उठविल्याने संस्कृतीला मिळणार उजाळा

By admin | Updated: January 11, 2016 01:04 IST

मंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली ...

जुने वैभव पुन्हा येणार : झाडीपट्टीत उत्साहाला उधाणघनश्याम नवघडे नागभीडमंडई, नाटक आणि शंकरपट या तीन गोष्टींना झाडीपट्टीत अनन्य साधारण महत्त्व आहे. यापैकी शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठविल्याने झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. बंदी उठल्याने झाडीपट्टीचा हा उत्सव लवकरच सुरू होणार आहे.झाडीपट्टीत प्रामुख्याने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्याचे प्रमुख आणि एकमेव पीक धान हेच आहे. या धान पीकाच्या हंगामाचा काळ जुलै ते डिसेंबर असा आहे. हा हंगाम झाल्यानंतर शेतकरी तसा मोकळाच असतो. या मोकळ्या वेळेत मनोरंजन म्हणून मंडई, नाटक आणि शंकरपटात तो आपला वेळ घालवण्यासाठी या प्रथा पडल्या असाव्यात, असे मत अनेकजण व्यक्त करीत असतात.साधारणत: दिवाळीपासून नाटक आणि मंडईची रेलचेल सुरू होत असली तरी शंकरपटांचा आरंभ मात्र मकरसंक्रांतीपासून सुरू होतो आणि तो जून, जुलैपर्यंत सुरू असतो. दोन-तीन दशकांपूर्वी शंकरपट प्रत्येक गावात भरवले जायचे. शंकरपट भरविण्यामागे या निमित्ताने नातलगांच्या भेटीगाठी आणि उपवर वधू-वरांची पाहणी हे सुद्धा कारण सांगितले जाते. पण आता काळ बदलला आणि याचबरोबर त्याच्या व्याख्याही बदलल्या. तशा शंकरपटावरही मर्यादा आल्या. शंकरपटाची ‘दान’ ही गावाजवळ वाहत असल्याने बदलत्या नागरिकरणात या दानीवर अतिक्रमणे झाली. काही गावातील दानी जंगल कायद्याच्या कचाट्यात सापडल्या तर मनोरंजनाची दालणे आता मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्याने काहीसे शंकरपटाकडे दुर्लक्ष सुद्धा केले.असे असले तरी शंकरपटाचे वेड काही कमी झाले नाही. याची प्रचिती नागभीड तालुक्यातील मसली, सावरगाव, गिरगाव, गोविंदपूर, वढोणा, सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, रत्नापूर, शिवणी, ब्रह्मपुरी तालुक्यात हळदा, मुडझा, रान्होरी, दिघोरी, सावली तालुक्यातील मगरमेंढा या गावात अनेकांनी घेतली आहे. लोक अक्षरश: झपाटून जात असतात. मिळेल त्या वाहनाने आणि भेटेल त्या सवंगड्यासोबत जावून शंकरपटाचा आनंद घेत असत.न्यायालयाच्या एका निर्णयानुसार मागील दोन वर्ष शंकरपटावर बंदी लादण्यात आली होती. त्यावेळी पटप्रेमी आणि ज्या गावात पटाचे आयोजन होते, त्या परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. म्हणूनच या निर्णयाविरोधात अनेकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. एवढेच नाही तर शंकरपट हे महाराष्ट्राचे मनोरंजन कसे आहे हे सुद्धा केंद्र शासनाला पटवून देण्यात आले. सर्व खात्री झाल्यानंतरच केंद्र शासनाने शंकरपटावर लादण्यात आलेली बंदी उठविली.केंद्र शासनाने शंकरपटावरील बंदी उठविल्यानंतर झाडीपट्टीत उत्साहाला उधान आले आहे. गेली दोन वर्ष शंकरपटावर बंदी असल्याने अनेकांनी आपले पटाचे बैल शेतीच्या कामात काढले होते. छकडे अडगळीत टाकले होते. पटाच्या दानीकडे दुर्लक्ष केले होते. या सर्वांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत.