शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर कापूस वेचणीचे संकट

By admin | Updated: October 29, 2015 01:34 IST

कोरपना तालुक्यात कापूस वेचणीकरीता कमी पैशात मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

शेतकऱ्यांच्या माथी उपेक्षाच कापूस वेचणीचे भाव कडाडले, मजुरांचा तुटवडाआशिष देरकर गडचांदूरकोरपना तालुक्यात कापूस वेचणीकरीता कमी पैशात मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे कापूस वेचण्याकरीता मजुरांअभावी शेतातील कापूस टवटवीत दिसत असतानाही शेतकऱ्यांचा चेहरा मात्र कोमेजलेला आहे.तालुक्यात मजुरीचे भाव कडाडले असून मजुरांना कापूस वेचणीसाठी चार ते पाच रुपये प्रति किलोप्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे गडचांदूर, कोरपना, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, भारोसा, भोयगाव या गावांसह आणखी काही गावातील कापूस वेचणाऱ्या मजुरांची सध्या तरी चांदी असून गरीब शाळकरी विद्यार्थी सुद्धा कापूस वेचणीच्या कामी लागले आहे. पण वर्षभर कर्ज काढून शेतीवर अवाढव्य खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांवर हवालदिल होण्याची पाळी आहे. कारण पाढरं सोनं शेतात वेचणीकरीता होऊन असतानाही मजुरांचा तुटवडा व कापूस वेचणीच्या भावामुळे शेतातच गळून पडत आहे.रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून हरभरा, गहू यासारख्या पिकाच्या मशागतीची कामे सुरु झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक समस्या भेडसावू लागल्या आहे. यंदा शासनाने कापसाला ४ हजार ५० रुपये हमी भाव दिला आहे. खेड्यापाड्यात दलालांकडून ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपयापर्यंत भाव दिला जात आहे. दलाल कमी पैशात खरेदी करु लागले आहेत. यावर्षी पाच ते सहा रुपये प्रति किलो कापूस वेचणी असा भाव असून शेतकऱ्यांना शेती न परवडणारी आहे. शेतकऱ्यांकडे गोदामाची व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी कापसाची साठवणूक करु शकत नाही. तसेच मजुरांनाही नगदी मजुरी द्यावी लागते. जो मालक नगदी मजुरी देतो अशाच शेती मालकाच्या शेतात मजूर जाताना दिसत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस विकण्या अगोदरच १२ ते १५ हजार मजुरी द्यावी लागत आहे.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर गावाहून मजूर आणण्याकरीता आणि परत सोडण्याकरीता आॅटो, मिनीडोअर करावा लागतो. एकतर मजुरीतही वाढ वरुन वाहनांचाही खर्च, एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मजूर म्हणतील त्याप्रमाणे वागावे लागत असल्याचे बोलके चित्र दिसत आहे. १०० टक्के कापूस वेचायला झाल्याने मजुरांची सध्या कमतरता भासत आहे. त्यामुळे याच संधीचा फायदा घेत मजूर तीन रुपये प्रतिकिलो कापूस वेचणी व ये- जा करण्याकरीता आॅटो किंवा मिनीडोअर या अटीवर कापूस वेचण्याकरीता जात आहे.सधन कास्तकारांना मजुरी देण्याकरीता विशेष आर्थिक ताण पडत नसला तरी पाच ते सहा क्विंटल कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना अर्धा कापूस मजुरी देण्याकरीताच जात आहे. यात मजुरांचाही काही दोष नाही. कारण कोणताही मजूर आपल्याला दोन पैसे कुठून जास्त मिळतील या प्रयत्नात असतो. वाढत्या महागाईमुळे मजुरीतही वाढ मागणे सहाजिकच आहे. त्यामुळे आता कापूस वेचणीचे यंत्र तरी विकत मिळावे, हा विचार कास्तकार करू लागले आहेत.वेळोवेळी शेतकऱ्यांना या ना त्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मजुरांचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे मजुरांनाही पाहिजे तेवढी मजुरी व वाहनांची सुविधा मिळत आहे, हे विशेष !