लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एप्रिलच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा ग्राफ सातत्याने वाढत आहे. त्यातच मागील चार ते पाच दिवसांपासून दररोज रुग्णसंख्या पाचशे ते सातशेच्या वर जात असून रविवारी ही संख्या हजारीकडे गेली आहे. रविवारी एकाच दिवशी रुग्णसंख्या ९३७ वर पोहचली आहे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने रुग्णवाढीमुळे जनमानसात दहशत पसरली असून मरण्यापेक्षा लाॅकडाऊन बरा, असे मत नागरिक आता व्यक्त करीत आहे. आजपर्यंत ४९२ रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. विशेष म्हणजे, आजपर्यंत एकूण बाघित रुग्णांची संख्या ३३ हजार हजार ५२९ वर पोहचला आहे.जिल्ह्यात मागील २४ तासात ३०५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ९३७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. ११ बाधितांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले असून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संकट अधिकच वाढ असल्याने प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
रविवारचे मृत्यू धक्कादायकरविवारी मृत्यू झालेल्यांमध्ये एका २९ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर अन्य मृत्यूही ४० ते ५५ वर्षादरम्यानचे आहे. त्यामुळे केवळ वयोवृद्धांचाच कोरोनामुळे मृत्यू होतो, हा नागरिकांचा समजही खोटाच निघाला आहे. रविवारी झालेल्या मृत्यूमध्ये सिंदेवाही येथील ६७ वर्षीय पुरुष, चंद्रपूर शहराच्या ऊर्जानगर येथील ४५ वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील ४३ वर्षीय पुरुष, रामनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील २९ वर्षीय पुरुष, बावणे लेआऊट वरोरा येथील ५१ वर्षीय पुरुष, शेगाव ता. वरोरा येथील ५० वर्षीय पुरुष, घुग्गुस येथील ५० वर्षीय पुरुष, गौराळा ता. भद्रावती येथील ५५ वर्षीय महिला, ख्रिस्तानंद चौक, भद्रावती येथील ४२ वर्षे पुरुष, संताजी नगर भद्रावती येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.