शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे रुपांतरण

By admin | Updated: September 13, 2016 00:38 IST

गेल्या काही वषार्तील सततची नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे.

रूपांतरित शेतकऱ्यांना३८ कोटींचे कर्ज वाटप१ लाख १० हजार शेतकऱ्यांना ६७० कोटींचे कर्जचंद्रपूर : गेल्या काही वषार्तील सततची नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकरी अहवालदिल झाला आहे. यामुळे पिक कर्जाची परतफेडही शेतक-यांना त्रासदायक आहे. अशा स्थितीत त्यांना आधार देण्यासाठी शासनाने पिककजार्चे रुपांतरण करुन नव्याने कर्ज उपलब्ध करुन देण्याची सुविधा दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २२ हजार शेतक-यांच्या मागील थकीत पिककजार्चे रुपांतरण करुन या शेतक-यांना ३८ कोटी रुपये नव्याने पिककर्ज म्हणून उपलब्ध करुन दिले आहे.गेल्या दोन तिन वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे नापिकी आणि दुष्काळासारखी स्थिती निर्माण होत आहे. त्याचा शेतक-यांच्या उत्पान्नावर परिणाम झाला आहे. पिक परिस्थीती चांगली नसल्याने शेतकरीही अहवालदिल आहे. अशा स्थितीत बँकेकडून घेतलेले पिककर्ज परतफेडीचाही अनेक शेतक-यांचा प्रश्न आहे. जुन्या कजार्ची परतफेड न केल्यास बँका नव्याने पिककर्ज देत नाही. अशा स्थितीत शेतकरी पिककजार्पासून वंचित राहू नये म्हणून शासनाने शेतक-यांच्या पिककर्जाच्या रुपांतरणाचा निर्णय घेतला होता.ज्या शेतक-यांचे मागील वषीर्चे पिककर्ज थकीत आहे अशा शेतक-यांच्या कजार्चे रुपांतरण करुन त्यांना नव्याने पिककर्ज दिल्या जात आहे. कजार्चे रुपांतरण करतांना थकीत कर्ज पुढील पाच वर्षात समान हप्त्यात भरण्याची सुविधाही आहे. विशेष म्हणजे पहिला हप्ता सुध्दा शेतक-यांना पुढील वर्षी भरावयाचा आहे. रुपांतरण योजने अंतर्गत २२ हजार शेतक-यांच्या पिककजार्चे रुपांतरण करण्यात आले आहे. रुपांतरणाची रक्कम ११७ कोटी इतकी आहे.विविध बँकांच्या वतीने दरवर्षी शेतक-यांना खरीप हंगामासाठी मोठया प्रमाणात पिककर्ज उपलब्ध करुन दिल्या जात असते. यावर्षी जिल्हयातील शेतक-यांना ७१४ कोटी रुपयाच्या पिककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी ११ हजार शेतक-यांनी ६७० कोटीचे पिककर्ज उचललेले आहे. (प्रतिनिधी)पीक कर्जाचे वाटप सुरूरुपांतरण झालेल्या ११ हजार शेतक-यांने नव्याने पिककजार्ची उचल केली आहे. त्यात ३८ कोटीच्या पीककजार्चा समावेश आहे. सदर रुपांतरणाची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका तसेच ग्रामीण बँकांनी राबविली असून आपल्या गेल्या वर्षीच्या थकीत शेतक-यांना रुपांतरीत करुन त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास प्रारंभ केला आहे. अद्यापही रुपांतरीत शेतकरी नव्याने पिककजार्ची उचल करु शकते.