शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

आजपासून बारावीची परीक्षा, जिल्ह्यात २८ हजार ३०३ परीक्षार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:49 IST

Chandrapur : ८७ केंद्रावर जिल्ह्यात बारावीची परीक्षा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. जिल्ह्यात ८७केंद्रांवर बारावीचे २८ हजार ३०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून केंद्रावर निगराणीत ठेवण्यात येणार आहे. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेट देणार आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी टीम तयार करण्यात येणार आहे. बैठे पथक पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणार आहे.

परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आल्यास त्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार आहे. त्यामुळे शिक्षकांसह संस्थाचालकांचे अधिकच टेन्शन वाढले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून केंद्रसंचालक तर पर्यवेक्षक, लिपिक शिपाई यांची नियुक्ती गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. भरारी पथकात वर्ग एक, वर्ग दोनचे अधिकारी तसेच महिला प्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात कुठेही गैरमार्गाचा वापर होणार नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागाचे लक्ष आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकही घेतली.

असे आहे परीक्षा केंद्रतालुका              केंद्र                विद्यार्थीचंद्रपूर                  १९                   ७३९६बल्लारपूर             ६                    १२७५भद्रावती                ४                    ११५७ब्रह्मपुरी                 ५                    २२४०चिमूर                    ६                    १७३२गोंडपिपरी              ५                    १११९कोरपना                 ६                   १५५१मूल                       ४                    १६३१नागभीड                ५                    १६४५पोंभूर्णा                  १                      ४४०राजुरा                   ८                    २०९०सावली                  ४                   १३१९सिंदवाही                ३                   ११३८वरोरा                    ७                   २३६३जिवती                   ४                   १२०७एकूण                  ८७७               २८३०३

"विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे विभागाचे संपूर्ण लक्ष आहे. परीक्षा केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहे."- राजेश पातळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक

टॅग्स :Educationशिक्षणchandrapur-acचंद्रपूर