शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

आजपासून बारावीची परीक्षा, जिल्ह्यात २८ हजार ३०३ परीक्षार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:49 IST

Chandrapur : ८७ केंद्रावर जिल्ह्यात बारावीची परीक्षा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. जिल्ह्यात ८७केंद्रांवर बारावीचे २८ हजार ३०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून केंद्रावर निगराणीत ठेवण्यात येणार आहे. तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेट देणार आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी टीम तयार करण्यात येणार आहे. बैठे पथक पूर्णवेळ परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणार आहे.

परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आल्यास त्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार आहे. त्यामुळे शिक्षकांसह संस्थाचालकांचे अधिकच टेन्शन वाढले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडून केंद्रसंचालक तर पर्यवेक्षक, लिपिक शिपाई यांची नियुक्ती गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. भरारी पथकात वर्ग एक, वर्ग दोनचे अधिकारी तसेच महिला प्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात कुठेही गैरमार्गाचा वापर होणार नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागाचे लक्ष आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकही घेतली.

असे आहे परीक्षा केंद्रतालुका              केंद्र                विद्यार्थीचंद्रपूर                  १९                   ७३९६बल्लारपूर             ६                    १२७५भद्रावती                ४                    ११५७ब्रह्मपुरी                 ५                    २२४०चिमूर                    ६                    १७३२गोंडपिपरी              ५                    १११९कोरपना                 ६                   १५५१मूल                       ४                    १६३१नागभीड                ५                    १६४५पोंभूर्णा                  १                      ४४०राजुरा                   ८                    २०९०सावली                  ४                   १३१९सिंदवाही                ३                   ११३८वरोरा                    ७                   २३६३जिवती                   ४                   १२०७एकूण                  ८७७               २८३०३

"विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे विभागाचे संपूर्ण लक्ष आहे. परीक्षा केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहे."- राजेश पातळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक

टॅग्स :Educationशिक्षणchandrapur-acचंद्रपूर