शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुर शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST

प्रशासकीय कार्यालयात आणि व्यापारी प्रतिष्ठानात ३१६ सीसीटीव्ही कॅमेरे : अपराध उघडण्यास कॅमेऱ्याची होते मोठी मदत बल्लारपूर : इलेक्ट्रानिक सिस्टीमच्या ...

प्रशासकीय कार्यालयात आणि व्यापारी प्रतिष्ठानात ३१६ सीसीटीव्ही कॅमेरे

: अपराध उघडण्यास कॅमेऱ्याची होते मोठी मदत

बल्लारपूर : इलेक्ट्रानिक सिस्टीमच्या युगात सीसीटीव्ही कॅमेऱ्याला मोठे महत्त्व आले आहे. प्रशासकीय सेवा असो की व्यापारी प्रतिष्ठान, येणाऱ्या जाणाऱ्याकडे करडी नजर ठेवण्याची पाळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर आली आहे. कॅमेरे लावण्यात बल्लारपूर व्यापारी, प्रशासन व नागरिक जागृत झाले असून प्रशासकीय कार्यालय, व्यापारपेठ आणि रस्त्यावर ठिकठिकाणी असे एकूण ३१६ कॅमेरे लागल्यामुळे बल्लारपूर शहर कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आले आहे.

शहरातील प्रशासकीय कार्यालयात ७३ सीसीटीव्ही कॅमेरे तर व्यापारी प्रतिष्ठानात २४३ सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. याशिवाय औद्योगिक वसाहतीत व बंगल्यात कॉम्प्लेक्समध्ये लागलेले कॅमेरे वेगळेच आहेत. प्रशासकीय कार्यालयामधून तहसील कार्यालयामध्ये १६, बसस्थानकावर १६, नगर परिषदमध्ये १०, ग्रामीण रुग्णालयात सात पोलीस स्टेशन ४ व रेल्वे स्थानकावर २० असे एकूण ७३ कॅमेरे लागले आहेत तर नगर परिषद फंडातून २८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरु आहे व काही मुख्य मार्गावर लागलेले आहे. याशिवाय डेपो टेकडी व वस्तीतील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडे, मॉलमध्ये, किराणा दुकानात कॉम्प्लेक्समध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहे.

बॉक्स

कॅमेऱ्यांमुळे गुन्हे उघडकीस

शहरात लागलेल्या कॅमेऱ्यांमुळे रात्रीच्या अंधारात चोरी करणाऱ्यावर वचक निर्माण होणार आहे. या कॅमेऱ्यामुळे आतापर्यंत अनेक चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी सीसीटीची कॅमेऱ्यांनी पोलिसांना मदत केली आहे. गणपती वॉर्डात झालेली चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळेच उघडकीस आली व पोलिसांना चोर हाती लागले. प्रीत किराणा येथे झालेली चोरी, बेंगळूर बेकरी समोरून पळवलेली बॅग, बटघरे गुरुजींवर लागलेला आरोपही सीसीटीची कॅमेऱ्यामुळेच फेटाळून लावला, अलिकडेच भगतसिंग वॉर्डातील अपहरण नाट्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळेच उघडकीस आले आहे.

कोट

शहरातील कॉम्प्लेक्स व घरात अनेक जणांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. परंतु त्यांच्या कार्यप्रणालीबाबत घरमालकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तो टाळण्यासाठी शहरातील घरमालकांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना आगाऊ माहिती मिळू शकेल

= उमेश पाटील,पोलीस निरीक्षक,बल्लारपूर.