शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

उमेद आंदोलनात सीईओंना करावी लागणार मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून भरतीसंदर्भात कर्मचारी ...

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. मात्र त्यांच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून भरतीसंदर्भात कर्मचारी संतापले असून विविध मार्गाने आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, १४-१५ डिसेंबर रोजी मुंबईत कुटुंबासह कर्मचारी धडकणार असून सरकारकडे आत्महत्येेची परवानगी मागणार आहे. त्यामु‌ळे उमेद प्रशासनाची झोप उडाली असून अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी राज्यभरातील सर्व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून या कर्मचाऱ्यांची मनधरणी करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करावे तसेच तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर सीईओ उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कशी मनधरणी करणार

याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटीपद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्याच्या सेवासमाप्ती तसेच बाह्य संस्थेकडून नव्याने पदभरती करण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचालीसुरु करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. दरम्यान विविध आंदोलन, मोर्चा काढून या कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच उपयोग झाला नसल्याने आता कर्मचारी कुटुंबासह थेट मुंबईला धडक देणार आहे. विशेष म्हणजे, या आंदोनात मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची परवानगी मागणार आहे. या आंदोलनाची महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाती मुख्य कार्यकारी अधिकारी उय जाधव यांनी दखल घेतली असून आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांनी पूर्णपणे प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान, राज्यभरातील सर्व सीईओंना पत्र पाठवून मंत्रालयावरील धडक मोर्चापासून त्यांना परावृत्त करून मनधरणी करून आवश्यत उपाययोजना करावी तसेच आंदोलनाचा कामकाजावर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक तरतूद करण्याचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर सीईओ या कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात काय निर्णय घेते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्मचाऱ्यांच्या वतीने अखेरचा जय महाराष्ट्र

विविध आंदोलन करूनही शासनस्तरावर कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून उमेद अभियानातील १० हजार कर्मचारी कुटुंबीयांसोबत मुंबईत आंदोलन करणार आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला ई-मेलद्वारे माहिती दिली असून सर्वात शेवट सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अखेरचा जय महाराष्ट्र असेही लिहण्यास विसरले नाही. त्यामुळे हे आंदोलन नेमके कोणती वळण घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.