शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा तालुक्याला गिळतोय प्रदूषणाचा भस्मासूर

By admin | Updated: February 11, 2016 01:19 IST

कोळसा खाणींचे दिवसेंदिवस वाढत चाललेले जाळे आणि प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसविल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

कोळसा खाणींनी प्रदूषणात वाढ : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण सुटलेप्रकाश काळे गोवरीकोळसा खाणींचे दिवसेंदिवस वाढत चाललेले जाळे आणि प्रदूषण नियंत्रणाचे नियम धाब्यावर बसविल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्यांच्यावर प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी दिली, त्यांचेच कर्तव्यात कसूर होत असल्याने प्रदूषणाचा भस्मासूर राजुरा तालुक्याच्या जीवावर उठला आहे.राजुरा तालुक्याला काळ्या सोन्याची देण आहे. मुबलक प्रमाणात दगडी कोळश्याचे साठे तालुक्यात असल्याने राजुरा तालुक्यात खुल्या व भूमिगत कोळसा खाणींची संख्या मोठी आहे. नव्या कोळसा खाणींचा विस्तार झपाट्याने वाढला आहे. कोळसा खाणीत होणाऱ्या शक्तीशाली बॉस्टिंगने मानसाचे आयुष्यच हादरले आहे. उद्योगांमुळे धुळ प्रदूषण होणे स्वाभाविक आहे. यासाठी उद्योगांनी कायदा न मोडता नियंमाचे तंतोतत पालन करणे आवश्यक असते. धुळ प्रदूषणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यान्वीत आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी नियमावली उद्योगांकडे आहे. परंतु, प्रदूषण नियंत्रणात आणणार कोण, असा प्रश्न सध्याच्या परिस्थीवरून दिसून येत आहे. एखाद्या वेळेस प्रदूषण नियंत्रण पथक तपासणीसाठी कोळसा खाणीत किंवा एखाद्या उद्योगाकडे गेले तर आमच्या कारखाण्यात धूळ प्रदूषण नाही, असा आव आणला जातो. प्रदूषण नियंत्रणाचे कागदी घोडे कागदावरच रंगविले जातात. नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर केला जात असेल तर सामान्य जनतेनी प्रदूषण नियंत्रणाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी एकट्या विभागावर ढकलून चालणार नाही तर उद्योगात धूळप्रदूषण होणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी प्रत्येकांनी घेतली पाहिजे. गोवरी, पोवन, सास्ती, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. कोळसा खाणीतील धुळीने परिसरातील नागरिकांचे आयुष्यच काळवंडले आहे. शेतपिकांवर उडणाऱ्या धुळीने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याचा नाहक त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. धुळीमुळे परिसरातील जनतेला श्वसनाचे आजार जडण्याची भिती आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील या मंडळाला आपले कर्तव्य चोख बजावावे लागणार आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारायला हवा. धूळ प्रदूषण ही आता सर्व सामान्य जनतेची मुख्य समस्या झाली आहे. यावर आता उपाययोजना करणे गरजेचे आहे असून एक दिवस तालुक्यातील शेकडो नागरिकांना जीवाला मुकावे लागेल.धूळप्रदूषणावर बसायला हवा चाप धूळ प्रदूषणामुळे अनेकांचे आयुष्य काळवंडत चालले आहे. बहुतांश नागरिकांना धुळीमुळे श्वसनाचे आजार जडले आहे. मोकळा श्वास घेण्याची संधी, गमावण्याची वेळ आली आहे. धुळीने चेहरा दुप्पट्याने झाकल्याशिवाय कुठेच बाहेर पडता येत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे झाले आहे.