शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मरण्यापेक्षा लाॅकडाऊन बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शनिवार तसेच रविवार विकेंड लाॅकडाऊन करण्याचा निर्णय ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शनिवार तसेच रविवार विकेंड लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लाॅकडाऊनला सामान्य नागिरकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मरण्यापेक्षा लाॅकडाऊन बरे, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक सध्या व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात रुग्णसंख्या चिंताजनक वाढत आहे. अनेकांना रुग्णालयात खाटाही मिळत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, लाॅकडाऊनला काही व्यावसायिकांचा विरोध आहे, तर लोकप्रतिनिधीही सावध भूमिका घेत आहे. लाॅकडाऊन झाल्यास सर्वांचेच नुकसान होणार असून, रोजीरोटीचा प्रश्न उभा ठाकणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी लाॅकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी हात पुढे करीत गरीब तसेच गरजूंना विविध प्रकारे मदत केली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे या संस्थाही आता गरिबांच्या मदतीला येतील, असे चित्र नाही. लाॅकडाऊन केल्यास लहान व्यावसायिक, मजूर वर्गांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र गरीब तसेच सामान्य नागरिक कोरोनाने मरण्यापेक्षा अडचणीत दिवस काढण्याच्या मानसिकतेत आहे.

बाॅक्स

लाॅकडाऊनमध्ये सूट द्यावी

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मात्र लाॅकडाऊन यावर पर्याय नाही. जर शासनाला लाॅकडाऊन करायचा असेल तर जरूर करावा. मात्र व्यावसायिकांना काही वेळासाठी का होईना व्यवसाय करण्यासाठी सूट द्यावी, अशी मागणीही काही व्यावसायिकांकडून केली जात आहे.

बाॅख्स

ग्रामीण भागातही दहशत

कोरोनाने आपले पाय घट्ट रोवणे सुरू केले आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण वाढत आहे. बहुतांश गावात आता कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे गावागावात दहशत पसरली आहे. मागील वर्षी बहुतांश ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्ण नव्हते. मात्र यावर्षी परिस्थिती चिंताजनक असून, गावातही मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढत आहे.

बाॅक्स

काय म्हणतात नागरिक.......

मागील वर्षी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे गरीब, गरजूंना दिलासा मिळाला. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. अनेकांचा जीवही गेला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शासन जर लाॅकडाऊन करत असेल तर त्याचा फायदाच होणार आहे. काही नागरिकांना यामुळे फटका बसेल. मात्र संकटापुढे तो कमीच असेल.

-मनोहर मिस्त्री

चंद्रपूर

कोट

लाॅकडाऊन केल्यास सर्वांचेच मोठे नुकसान होणार आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णालयात खाटा उपलब्ध नाही. उपचारासाठी धावाधाव होत आहे. आरोग्य प्रशासनावर आता ताण पडत आहे. अशास्थितीत लाॅकडाऊन केल्यास रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे.

-रोहित ठाकूर

चंद्रपूर