शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

अस्वल, चितळ अपघातात ठार, बिबट जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:26 PM

जिल्ह्यातील चंद्रपूर- मूल महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे वन्यजीवांचे बळी जात आहेत़ मागील महिन्यापासून अपघाताची मालिकाच सुरू असून १५ दिवसांत दोन अस्वल, एका चितळाचा जागीच मृत्यू झाला. तर एक बिबट गंभीर जखमी झाला आहे. या मार्गावरील जंगलग्रस्त भागात वन्यजीवांच्या कायमस्वरुपी सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी इको-प्रो संस्थेने केली. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. ३१ जून रोजी मूल ते चंद्रपूरपर्यंत पायी यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वनसंरक्षक विजय शेळके यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांच्या सुरक्षेसाठी उपाय करा : इको-प्रो काढणार मूल ते चंद्रपूर पायी यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील चंद्रपूर- मूल महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे वन्यजीवांचे बळी जात आहेत़ मागील महिन्यापासून अपघाताची मालिकाच सुरू असून १५ दिवसांत दोन अस्वल, एका चितळाचा जागीच मृत्यू झाला. तर एक बिबट गंभीर जखमी झाला आहे. या मार्गावरील जंगलग्रस्त भागात वन्यजीवांच्या कायमस्वरुपी सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी इको-प्रो संस्थेने केली. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दि. ३१ जून रोजी मूल ते चंद्रपूरपर्यंत पायी यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती वनसंरक्षक विजय शेळके यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन शेजारून जाणारा मूल-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. बांधकामाला सुरूवात झाली. दोन्ही बाजूने विस्तीर्ण घनदाट जंगल असल्याने वाघ, बिबट्यांसह तृणभक्षी प्राण्यांचा अधिवास वाढतच आहे. सध्या या रस्त्याच्या काही भागात कामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी चारपदरी सिमेंट रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. या बांधकामामुळे वाहने एकाच बाजूने वळविण्यात येत आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी मालवाहू वाहने भरधाव दामटल्या जाते. अशावेळी हा मार्ग ओलांडून जाणाऱ्या वन्यजीवाचा अपघात होत आहे. वाहनांची गती आणि लख्ख दिव्यांचा प्रकाशही कारणीभूत ठरत आहे. वाहन पुढे आले तर कुठे पळावे, हे वन्यजीवांना कळत नाही़ यापूर्वी या मार्गावर वाघ, बिबट, अस्वलाचा मृत्यू झाला.हा मार्ग ताडोबा ते दक्षिणेकडे इंद्रावती व्याघ्र प्रकल्प व तेलंगणा वनक्षेत्राला जोडणारा वन्यप्राणी भ्रमणमार्ग आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना हा मार्ग ओलांडून पुढे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग तयार करणे गरजेचे आहे. मात्र, महामार्ग निर्माण करण्याच्या प्रस्तावात 'वाइल्ड लाइफ मिटिगेशन'बाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. मागील १५ दिवसांत घडलेल्या घटनांमुळे वन्यजीवप्रेमी चिंताग्रस्त असून भविष्यात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय निर्णय घ्यावा अन्यथा भरधाव वाहनांना निष्पाप बळी पडणाºया मुक्या वन्यप्राण्यांची संख्या पुन्हा वाढण्याचा धोका आहे, याकडेही इको- प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी लक्ष वेधले.वन्य प्राण्यांचे अधिवास आणि भ्रमणमार्ग लक्षात घेवून रस्त्याचे बांधकाम करावे, या मागणीसाठी मूल ते चंद्रपूर शहरापर्यंत 'पायदळ यात्रा काढण्यात येईल. त्यामध्ये नागरिक सहभागी होतील, अशी माहिती धोतरे यांनी दिली. या निवेदनाची प्रत ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक मुकुल त्रिवेदी, विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांनाही पाठविण्यात आली आहे.