शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

बी- बियाणांचे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST

मासळ(बु) : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातही शासनाकडून ३१ मेपर्यंत ...

मासळ(बु) : कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातही शासनाकडून ३१ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आपले सरकार, सेतू सुविधा केंद्र तसेच इंटरनेट कॅफे बंद आहेत. शेतकऱ्यांनी आता २० मेपर्यंत महाडीबीटीवरील योजनांसाठी अर्ज करायचा कसा, असा प्रश्न पडला आहे.

परंतु टाळेबंदी असल्याने ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

राज्य शासनाच्या अनेक योजनांचा महाडीबीटी पोर्टल अंतर्गत अर्ज भरून शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. खरिपाचा हंगाम सुरू झाला असून बियाणे लागवडीसाठी शेतकऱ्यांना भात, तूर, सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी बी-बियाणे ५० टक्के अनुदान तत्त्वावर मिळणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर मुदत मिळाली असून, २० मेपर्यंत अर्ज भरावे लागणार आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे आपले सेवा केंद्र, सेतू केंद्र, इंटरनेट कॅफे बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा तरी कसा, अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर ऑनलाइन अर्जाद्वारे शेतकऱ्यांना योजनेची निवड करण्याचे अधिकार दिले आहे. राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांसाठी भात, कापूस, सोयाबीन, तूर व ज्वारी आदी बी- बियाणे अनुदान तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. परंतु अर्ज भरून देणारे ऑनलाइन सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. इंटरनेट व इतर माहितीच्या अभावामुळे योजनेचा लाभ घेता येणार किंवा नाही, यांची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अर्ज सादर करण्यासाठी प्रशानाकडून पर्यायी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.

बॉक्स

वाहतूक सेवा बंद

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना महाडीबीटीवर माहिती भरताना अनेक अडचणी येत असून, अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जात आहेत. त्यातही बससेवा व खासगी प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

कोट

लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना बी- बियाणांसाठी अर्ज भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने सेतू सुविधा केंद्र सुरू करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी.

-नितेश गणवीर, शेतकरी मासळ ( बु ).