शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीवर शिवनीजवळ हवा बंधारा

By admin | Updated: June 21, 2015 01:59 IST

वर्धा नदीपट्टयातील शेतीचे सिंचन व्हावे तथा परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा,

चंद्रपूर : वर्धा नदीपट्टयातील शेतीचे सिंचन व्हावे तथा परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, या हेतुने चंद्रपूर शहरापासून केवळ आठ कि.मी. अंतरावरील तालुक्यातील शिवनी (चोर) येथे वर्धा नदीवर बंधारा बंधण्याची मागणी येथील गावकऱ्यांकडून होत आहे. यासाठी शिवणी येथील शेतकऱ्यांनी स्वाक्षरी मोहिमेतून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. वर्धा नदीपट्ट्यातील जमीन सुपीक असून शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेती समृद्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. २० वर्षापूर्वी हडस्ती, धानोरा (पिपरी) आणि शिवनी (चोर) येथे वर्धा नदीवर उपसा जलसिंचन योजना कार्यरत होती. मात्र कालांतराने या तिनही योजना बंद पडल्या. बंद सिंचन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी या गावातील शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांकडे मागणी केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या परिसरात वेकोलिच्या खाणींमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी आधीच खोलवर गेली आहे. शिवनी येथे वर्धा नदीवर बंधारा झाल्यास परिसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासोबतच नदीपलीकडील राजुरा व कोरपना तालुक्यातील गावांसोबरोबरच चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील गावांना सिंचनाचा लाभ होईल. तथा पिण्याच्या पाण्याचीही सोय होईल. २००३ च्या सुमारास शिवनी-मार्डा परिसरात बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षणसुद्धा झालेले आहे. मात्र पाठपुराव्याअभावी सदर प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. वर्धा नदीपट्यातील आजवर अत्यंत मागास राहिलेल्या या भागात कोणताही सिंचन प्रकल्प नसल्यामुळे या परिसरातील शेतजमीन सुपीक असूनही सिंचनापासून वंचित राहिलेली आहे. या पार्श्वभुमीवर शिवणी येथे बंधारा मंजूर करण्याची मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी (ओबीसी विभाग) अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केली आहे.जिल्ह्यातील सिमेंट उद्योग, औष्णिक वीज प्रकल्प, पोलाद उद्योग व एमआयडीसीतील लघु उद्योगांद्वारा वर्धा नदीतून होणारा पाण्याचा उपसा व भविष्यातील पाण्याची निकड विचारात घेऊन तसेच शेती सिंचन आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता वर्धा नदीवर चंद्रपूर जिल्ह्यात एकुण ७ बॅरेजस्ची शृंखला प्रस्तावित आहे. यात दिंडोरा व मार्डा (त. वरोरा), तेलवासा (त. भद्रावती), धानोरा (त. चंद्रपूर), हडस्ती व आमडी (त. बल्लारपूर), आर्वी धनूर (त. गोंडपिपरी) यांचा समावेश आहे. सदर प्रकल्प जलसंपदा विभाग वा स्थानिक उद्योगांच्या सहभागातून प्रस्तावित असल्याचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने राजुराचे माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांना पत्राद्वारे कळविलेले आहे. मात्र सिंचाई विभागाच्या अनास्थेमुळे बराच कालावधी लोटूनही मार्डा (त. वरोरा) वगळता इतर प्रकल्पांचे काम अद्याप सर्व्हेक्षणाच्या पुढे गेलेले नाही.शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता आणि शेती समृद्ध होण्यासाठी सदर बंधाऱ्याच्या श्रृंखलेत वर्धा नदीवर शिवनी येथील बंधाऱ्याचाही समावेश करून त्यालादेखील मंजुरी द्यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी (ओबीसी विभाग) अध्यक्ष उमाकांत धांडे, संदीप डाखरे, लक्ष्मण एकरे, किशोर ढुमणे, रवींद्र चटके, गजानन भोंगळे, विनोद झाडे, संजय उमरे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, रतन वैद्य, मंगेश भोयर, सुरेश पोडे, दौलत घटे, उत्तम बोबडे, अरूण उरकुडे, साईनाथ देठे, नत्थु पाटील बोबडे, लहु पाटील भोयर, कवडू पाटील कौरासे आदींसह गावकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)