शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अनलाॅकनंतर भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:19 IST

चंद्रपूर : मान्सून दाखल झाल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी ...

चंद्रपूर : मान्सून दाखल झाल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे. या परिसरातील शेतकरी भात, सोयाबीन, कापूस पिकांचे उत्पादन घेत असतात. पीक निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी भाजीपाल्याची लागवड करीत असतात. त्यामुळे उन्हाळभर शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची आवक माेठ्या प्रमाणावर असते. यासोबतच बाहेरील बाजारपेठेतून भाजीपाल्याची आवक होत असते. याचा परिणाम म्हणून उन्हाळ्यात भाजीपाल्याचे दरही कमी व स्थिर असतात, परंतु यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जिल्ह्यात मान्सून बरसला. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागले. परिणामी भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पूर्वी २० रुपये किलो असलेले कांदे ३० रुपये तर टोमॅटोसुद्धा २० रुपये किलोवरुन ३० रुपयांवर पोहोचले आहे. लसून ३० ते ४० रुपये पाव दराने विकला जात आहे. यासोबतच बटाटे, भेंडी, मिरची, फुलकाेबी, पत्ताकाेबी, कारले, वांगी, पालक आदी भाजीपाल्यांचे दर पंधरवड्यापूर्वी कमी हाेते. त्यानंतर आता या सर्वच भाजीपाल्याच्या किमतीत जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासोबतच मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. काही दिवसांपूर्वी तेलाचे दर कमी झाले होते. मात्र आता भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

कोट

जेवणात हिरव्या भाजीपाल्याचा समावेश असावा, असे डॅाक्टर सांगतात,परंतु कोणतीही भाजी खरेदी करण्यास गेला तर १५ रुपये पाव आहे. त्यामुळे काय खरेदी करावे हे कळेनासे झाले आहे. कोरोना लॉकडाऊनने सर्वच आर्थिक गणितच कोलमडले आहे. कडधान्य खाण्यावर भर आहे.

- संजना बन्सोड, गृहिणी

काही दिवसांपूर्वी तेलाचे दर कमी झाले; मात्र आता भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. पूर्वीच कोरोनाने आर्थिक घडी बसवताना अडचण जात आहे. त्यातच दररोजच्या होणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. साध वरणभात खाणेसुद्धा अवघड झाले आहे.

- प्रिया गेडाम, गृहिणी

मान्सून दाखल झाल्याने शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत. तसेच पावसाळ्यामुळे शेतातील भाजीपाला निघणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला बंद झाला आहे. केवळ बाजारपेठेतून भाजीपाल्याची आवक होत आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याचे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. साधारणत: जून महिन्यात दर वाढतच असतात.

- राकेश रघाताटे, व्यापारी

जून महिन्यात भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने दरवर्षीच भाजीपाल्याचे दर वाढत असतात. उन्हाळ्यात कांद्यांचे दर कमी होत असतात. परंतु, पावसाळ्यात दर वाढत असतात. सध्या २० ते २५ टक्क्याने भाजीपाला महागला आहे.

- रुपम खैरे, विक्रेता

जेव्हा आमचा भाजीपाला बाजारपेठेत येतो. तेव्हा दर घसरले असतात. परंतु, ज्यावेळेस शेतातील भाजीपाला संपतो. त्यावेळी भाजीपाल्याच्या किमती वाढत असल्याचे नेहमीच बघायला मिळते

- रुपेश राऊत, शेतकरी

भाजीपाला पिकातून उत्पन्न मिळेल या आशेने आम्ही दरवर्षी भात पीक निघाल्यानंतर भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतो, परंतु दरवर्षीच पदरी निराशा पडत असते.

- रघूजी लाड, शेतकरी