शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६०४ ग्रामपंचायतींच्या ४ हजार १९१ जागांसाठी ६४.९० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST

सकाळी ७ वाजता २ हजार १३८ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली नाही. ...

सकाळी ७ वाजता २ हजार १३८ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली नाही. सकाळी १० वाजतानंतर गर्दी वाढू लागली. जिल्ह्यातील १५ तालुक्यात दुपारी ३.३० वाजतापर्यंत ६४. ९० टक्के मतदान झाले. दुपारी २ वाजतानंतर सर्वच मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सायंकाळी ३.३० वाजतापर्यंत ६४.९० टक्के मतदान झाले होते. मतदानाची अंतिम टक्केवारी ८५ च्या घरात जाईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते डोअर टू डोअर प्रचार केला. मतदानादरम्यान कुठेही हिंसक घटना घडली नाही. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मतदान केंद्रावर थर्मल स्क्रिनिंग केल्यानंतरच मतदारांना आत सोडले जात होते. एका मतदाराला तीन उमेदवार निवडून द्यायचे असेल तर तीनदा मतदान यंत्राची कळ दाबावी लागत होती. तीनदा कळ दाबल्याशिवाय बीप वाजत नव्हता.

अंधारामुळे लोनवाही केंद्रात अडचण

सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथील वाॅर्ड क्रमांक चारमधील मतदान केंद्रावर अंधार असल्याने मतदारांना निवडणूक चिन्ह दिसत नव्हते. मतदारांनी या समस्येकडे लक्ष वेधल्याने तातडीने विजेची व्यवस्था करण्यात आली. वाॅर्ड क्रमांक चारमध्ये केंद्रात एका उमेदवाराला ओळखपत्र मिळाले नव्हते. आक्षेप नाेंदविल्यानंतर अडचण दूर झाली.

राजुरा तालुक्यात सर्वाधिक मतदान

राजुरा तालुक्यात सर्वाधिक ७५.२७ टक्के मतदान झाले. तालुक्यात २९ हजार ३३३ मतदारांपैकी २२ हजार ८० मतदारांनी मतदान केले. यातही महिलांचे प्रमाण अ्धिक आहे. नवीन मतदार मोहिमेला युवतींनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पुरुष मतदारांच्या तुलनेत यंदा टक्केवारी वाढली आहे.

चंद्रपूर तालुका माघारला

चंद्रपूर तालुक्यातील बहुतांश गावांचा संपर्क शहराशी आहे. निवडणूक विभागाने यंदा मतदान यादी अपडेट केली. शहराशी संपर्क असूनही दुपारी ३.३० वाजतापर्यंत केवळ ४६. ८१ टक्के मतदान झाले. गोंडपिपरी, पोंभुर्णा, मूल तालुक्यातील काही ग्रामपंचायती दुर्गम भागात असतानाही मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेतल्याचे दिसून आले.

विविध राजकीय पक्षांचे लक्ष

एकाच वेळी ६०४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी विविध आघाड्यांच्या माध्यमातून या निवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या उडी घेतली होती. या निवडणुकीत जिल्ह्यातील निम्मे मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचा कल कुणाकडे आहे. हे कळणार आहे. या दृष्टीने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली होती. या निवडणुकीच्या दि. १८ जानेवारी रोजी मतमोजणीत कोणत्या पक्षाची समर्थित आघाडी बाजी मारते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.